'मन उडू उडू झालं'मधील दीपूची मालिकेतून एक्झिट?...'या' कारणामुळे सोडली मालिका

'मन उडू उडू झालं' मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत दिपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने या मालिकेला रामराम केला आहे.  

Updated: May 2, 2022, 09:57 AM IST
'मन उडू उडू झालं'मधील दीपूची मालिकेतून एक्झिट?...'या' कारणामुळे सोडली मालिका title=

मुंबईः छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते. हृताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सुद्धा चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे.

मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत 'दिपू'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळेने या मालिकेला रामराम केला आहे.

हृता दुर्गुळे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हृता दुर्गुळे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हृता ही सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे. या भूमिकेमुळे हृता ही चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. मात्र नुकतंच हृताने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

 
सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मालिकेच्या निर्मात्यांसोबत हृताचे भांडण झालं होतं. या मालिकेच्या सेटवर स्वच्छता नसल्याने त्यांच्यात वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेहा वाद सध्या विकोपाला गेला आहे. यामुळेच हृताने ही मालिका सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. 

हृताने या मालिकेत काम करण्यापूर्वी करार केला होता. त्या करारानुसार तिला एक महिन्याचा नोटीस पिरीयड पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतरच तिला ही मालिका सोडता येणार आहे. दरम्यान हृताने अद्याप याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. 

हृता दुर्गुळे ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. हृताचे इन्स्टाग्रामवर 2 मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी हृताचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर आता ती लवकरच प्रियकर प्रतीक शाह याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मे महिन्यात ते दोघेही लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे.