लग्नानंतर कतरिना सलमान खानसोबत निघाली कुठे

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी नुकतंच राजस्थानमध्ये ९ डिसेंबर रोजी शाही पद्धतीने लग्न केलं.

Updated: Dec 18, 2021, 04:11 PM IST
लग्नानंतर कतरिना सलमान खानसोबत निघाली कुठे title=

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी नुकतंच राजस्थानमध्ये ९ डिसेंबर रोजी शाही पद्धतीने लग्न केलं. हे कपल मुंबईत परतले असून सतत चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे दोघंही लग्नानंतर ब्रेक न घेता कामावर परतणार आहेत. होय! कतरिना लवकरच सलमानसोबत 'टायगर 3'च्या शूटिंगसाठी 15 दिवसांच्या शेड्यूलवर निघणार आहे.

'टायगर 3'चं शूटिंग दिल्लीत होणार आहे
Bollywoodlife.com च्या बातमीनुसार, कतरिना कैफ लवकरच सलमान खानसोबत आगामी चित्रपट 'टायगर 3' चं शूटिंग दिल्लीत सुरू करणार आहे. चित्रपटाचं बरेचसे चित्रीकरण आधीच झालं आहे. आता पुन्हा कतरिना आणि सलमान या सुपरहिट फ्रँचायझीवर काम करणार आहेत.

नवीन वर्षात कामाला सुरुवात 
याआधी कतरिना आणि सलमान खानने रशिया, तुर्की, ऑस्ट्रेलिया आणि मुंबईत या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित आगामी स्पाय थ्रिलर 'टायगर 3' आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. दोघं जानेवारीच्या मध्यापासून दिल्लीत चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या भागाचं शूटिंग करतील. दिल्लीत जवळपास 15 दिवस या चित्रपटाचं शूटिंग चालणार असल्याचीही माहिती आहे.

या चित्रपटात ओरिजनल फिल आणण्यासाठी सलमान खान आणि कतरिना कैफ कृत्रिम सेटवर नाही तर खऱ्या लोकेशन्सवर शूट करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासाठी या सिनेमाची टिम तयारीत व्यस्त आहे. सेलिब्रिटींची लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी या बाबतीत सुरक्षा व्यवस्थाही केली आहे.

त्यानंतर आता विकीने आपला एक सेल्फी पोस्ट केला आहे. तो लग्नानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात करत आहे. फोटो शेअर करत त्याने पहिला चहा मग काम असं कॅप्शन देखील लिहिलं आहे. त्यामुळे अनेकांनी कतरिनाच्या हातच चहा पिऊन मगच कामाला सुरुवात करणार का असा प्रश्न देखील विचारला आहे.