मलायकालापासून घटस्फोटानंतरही अरबाजला येते बायकोची आठवण? वेगळं होण्यामागचं सांगितलं कारण

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना वेगळं होऊन बरीच वर्षे उलटून गेली आहेत

Updated: Nov 11, 2021, 09:30 PM IST
 मलायकालापासून घटस्फोटानंतरही अरबाजला येते बायकोची आठवण? वेगळं होण्यामागचं सांगितलं कारण  title=

मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना वेगळं होऊन बरीच वर्षे उलटून गेली आहेत. दोघांनीही आपापल्या इच्छेने एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. मलायका अरोरा अनेकदा घटस्फोटाबद्दल बोलली आहे. मात्र मलायकापासून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खानला वेदना झाल्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. मलायका अरोरापासून वेगळं होण्याचं कारणही त्याने सांगितलं.

वेगळं होणं आवश्यक होतं
एका रिपोर्टनुसार, अरबाज खान म्हणाला, 'माझा मुलगा अरहान खानसाठी हे खूप कठीण पाऊल होतं. मला असं वाटतं की, कठिण वेळेला ठिक करण्यासाठी मलायका अरोरापासून माझं वेगळं होणं खूप आवश्यक होतं. सध्या मलायका अरोराकडे मुलगा अरहानचा ताबा आहे आणि तेही ठीक आहे असं मला वाटतं. कारण फक्त आईच एका मुलाची चांगली काळजी घेऊ शकते. याच कारणामुळे मी अरहानच्या कस्टडीसाठी कधीही संघर्ष केला नाही.

मुलगा अरहानला सगळं कळतं
मुलाखतीदरम्यान अरबाज खानला विचारण्यात आलं की, मुलगा अरहानला याबद्दल सांगणं कठीण होतं का? यावर त्याने उत्तर दिलं की, माझा मुलगा त्यावेळी फक्त 12 वर्षांचा होता. त्याला सगळं काही समजत होतं. त्याला चांगलंच माहीत होतं हे सगळं काय होतंय? त्याला अजिबात आश्चर्य वाटलं नाही.