'आमची अब्रू जाईल अशा शोमध्ये परत जाणार नाहीस... सासूबाई असं म्हणताच अंकितानं दिलं सडेतोड उत्तर

'बिग बॉस 17' च्या ग्रॅंड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेला पाठिंबा देण्यासाठी तिच्या सासुनं देखील हजेरी लावली होती. मात्र, त्यांनी अंकिताला खडेबोल सुनावण्यास सुरुवात केली. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 29, 2024, 03:19 PM IST
'आमची अब्रू जाईल अशा शोमध्ये परत जाणार नाहीस... सासूबाई असं म्हणताच अंकितानं दिलं सडेतोड उत्तर title=
(Photo Credit : Social Media)

Ankita Lokhande : 'बिग बॉस 17' च्या ग्रॅंड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेची सासु रंजना जैन लाल यांनी हजेरी लावली होती. रंजना यांनी यावेळी बनारसी साडी नेसली होती. त्या त्यांच्या मोठ्या सुनेसोबत यावेळी पोहोचले होते. सलमाननं प्रेमानं त्यांची मस्करी केली आणि अंकिताशी काही वचन देखील घेतले. विकी जैनची आई शोमध्ये फॅमिली वीकमध्ये देखील पोहोचली होती. ज्यानंतर त्यांचं कुटुंब हे चर्चेत होतं. खरंतर या शोमध्ये अंकिता आणि विकी जैन यांच्यात खूप मोठं भांडण झालं. त्यावरुनचं अंकिताच्या सासुनं तिची सुनावले घेतली. आता ग्रॅंडफिनालेच्या वेळी देखील सगळ्यांसमोर अंकिताच्या सासूनं तिला खडेबोल सुनावले. 

अंकितानं या शोमध्ये नवरा विकी जैनसोबत एन्ट्री घेतली होती. मात्र, इथे आल्यानंतर त्या दोघांमध्ये सतत भांडण होऊ लागली होती. अंकितानं विकीवर चप्पल देखील फेकून मारली होती आणि त्यावर हात देखील उगारला होता. मात्र, नंतर अंकिता आणि विकीनं खुलासा केला की हे फक्त मस्करीमध्ये होतं. अंकिताच्या सासरच्या लोकांना हे आवडलं नाही. त्यानंतर फॅमिली वीकमध्ये जेव्हा सासूनं हजेरी लावली होती तेव्हा सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु होती. तर आता विकी आणि त्याची आई दोघेही फिनाले एपिसोडमध्ये पोहोचले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ग्रॅंड फिनालेमध्ये सलमान अंकिताच्या सासूची मस्करी करताना दिसला. त्यासोबत त्यानं अंकिताकडे 7 वचन देखील मिळवून दिले. सलमान अंकिताच्या सासूला म्हणाला की 'मला माहित आहे की तुमच्या दुसऱ्या सुनेनं तुम्हाला छान खाऊ घालून इथे आणलं आहे. आज उपवास नाही तर बोला. तुमच्या नवऱ्याला देखील तुमचा आवाज ऐकायचा आहे. त्यांचीतर इच्छा आहे की पुढच्या सीझनमध्ये तुम्ही यावं. यांनी तर काही केलं नाही, अंकितापेक्षा तुम्हाला लोकप्रियता मिळाली असेल विलासपुरमध्ये.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रंजना यांनी लगेच अंकितानं कशी शोमध्ये चांगली वागणूक केली नाही आणि कुटुंबाचं नाव खराब केलं. सलमाननं जेव्हा अंकिताशी चर्चा करण्यास सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या की त्यांची फक्त एकच इच्छा आहे की अंकितानं त्यांच्या मुलाशी प्रेम करावं, त्याला चांगली वागणूक द्यावी आणि कधीच अशा कोणत्या शोमध्ये स्पर्धक म्हणून जायला नको, त्याच कारणामुळे संपूर्ण जगासमोर कुटुंबाचं नाव खराब होतं. त्या म्हणाल्या की अशा शोमध्ये कधीच जाणार नाहीस, जिथे गेल्यानंतर कुटुंबाची अब्रु जाईल.

हेही वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकीनं मुलाखत सुरु असतानाच केली तोडफोड; काठी उचलली आणि...

सासुनं केलेलं हे वक्तव्य ऐकूण तिला आश्चर्य झालं. त्यांनी म्हटलं की 'सासु बाई मी तुम्हाला ग्रॅंड फिनालेमध्ये वचन देते की ती कधीच त्यांच्या मुलांशी भांडणार नाही. तर सासु बाई करत असलेलं वक्तव्य मध्येच थांबवत म्हणते की मला इंडस्ट्रीचा भाग होऊन आनंद आणि गर्व वाटतो.'