'रणवीर आणि दीपिकाचे लग्न होणार नाही', एका बॉलिवूड अभिनेत्याचे व्यक्तव !

‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ या हिट चित्रपटांमध्ये झळकलेली प्रसिद्ध जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 28, 2017, 03:10 PM IST
 'रणवीर आणि दीपिकाचे लग्न होणार नाही', एका बॉलिवूड अभिनेत्याचे व्यक्तव ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : ‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ या हिट चित्रपटांमध्ये झळकलेली प्रसिद्ध जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. पडद्यामागेही या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते. या दोघांविषयी जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून रणवीर-दीपिकाचा ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, डिनर डेट आणि दोन दिवसांपूर्वीच झालेल्या मुकेश अंबानींच्या पार्टीत हे दोघे कॅमेऱ्यासमोर एकत्र दिसले. सोशल मीडियावर दोघांचेही एकत्र फोटो बघितल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लागला. आता ही जोडी आगामी चित्रपट ‘पद्मावती’ मध्ये एकत्र दिसेल.

रणवीर – दीपिका यांना एकत्र बघितल्यानंतर तुम्ही विवाहबंधनात केव्हा अडकणार? असा प्रश्न चाहत्यांनाकडून त्यांना अनेकदा विचारला जातो.  परंतु बॉलिवूडच्या एका खानने या दोघांचे कधीच लग्न होणार नसल्याचे म्हटले आहे.  स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल आर खानने रणवीर – दीपिकाच्या लग्नाबद्दल भविष्यवाणी केलीये. याविषयी केलेल्या ट्विटमध्ये केआरकेने लिहिलंय की, ‘सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचे कधीच लग्न होणार नाही असे मी म्हणालो होतो. ते खरं झालंय. आज मी सांगतो की काहीही झाले तरी रणवीर आणि दीपिकाचे लग्न होणार नाही.’ या ट्विटनंतर त्याने आणखी एक ट्विट केले. ‘रणवीर – दीपिका हे काही प्रेमीयुगुल नसून ते केवळ मित्रमैत्रीण आहेत’, असे त्याने म्हटलेय.

 

केआरके नेहमीच वायफळ बडबडत असतो. त्यामुळे हे ट्विट रणवीर आणि दीपिकाचे चाहते कितपत गंभीरपणे  घेतात की त्याकडे दुर्लक्ष करतात ते लवकरच कळेल.