Ananya Pandey चं ब्रेकअपनंतर मूव ऑन होण्याबाबत मोठं वक्तव्य, युझर्स म्हणाले,'आदित्य रॉय कपूरसोबतचं नातं संपलं?'

Aditya Roy Kapoor And Ananya Pandey : सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचा सिनेमा 'फिल्म खो गए हम कहां' याचा ट्रेलर लाँच झाला. यावेळी अनन्या पांडे वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर देताना दिसली. तेव्हा तिने ब्रेकअप आणि मूव होण्याबद्दल सांगितलं. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 11, 2023, 10:25 AM IST
Ananya Pandey चं ब्रेकअपनंतर मूव ऑन होण्याबाबत मोठं वक्तव्य, युझर्स म्हणाले,'आदित्य रॉय कपूरसोबतचं नातं संपलं?' title=

Ananya Pandey On Break Up : अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सिद्धांत चतुर्वेदीसोबतच सिनेमा Kho Gaye Hum Kahan मुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या दरम्यान अनेक प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम झाला. अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्रेलर लाँच दरम्यान अनन्या पांडेने ऑफ वाइट ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. ट्रेलर लाँच दरम्यान अनन्या पांडेला एक प्रश्न विचारण्यात आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

ब्रेकअप आणि मूव ऑन

अनन्या पांडेला ब्रेकअपनंतर मूव ऑन होण्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. ज्यावर अनन्याने दिलेली प्रतिक्रिया खूपच चांगली व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाला का?असा सवाल केला. जाणून घेऊया अनन्या पांडेच्या रिऍक्शनची.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

काय बोलली अनन्या पांडे?

मूव ऑन करण्यावर अनन्या पांडेला विचारण्यात आलं. त्यावर अनन्या म्हणाली,'जास्त लवकर मूव ऑन करु नका. त्या स्थितीत राहा आणि आइस्क्रिम खा' अनन्याचं हे उत्तर सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. 

अनन्या-आदित्य 

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे. एवढंच नव्हे तर लोक्रिय शो 'कॉफी विथ करण सिझन 8' मध्ये दोघांच्या नात्याबद्दल खूप चर्चा झाली. कळत नकळत अनन्या पांडेने आदित्य रॉय कपूरचं नाव घेतलं. या वक्तव्यानंतर आता अनन्याचं आलेलं हे विधान चर्चेसाठी पुरेसं आहे. 

यासोबतच आता अनन्याने केलेले हे विधान चर्चेस कारण ठरलं आहे. प्रेमाची चर्चा होत असतानाच ब्रेकअपवर केलेलं हे विधान अतिशय महत्त्वाचं ठरलं आहे. सध्या याची जोरदार चर्चा होतेय.

सिनेमाची कथा 

अनन्याचा सिनेमा तीन जिवलग मित्रांच्या कथेभोवती फिरतो कारण ते सोशल मीडियावर जीवनात नेव्हिगेट करतात, त्यांच्या वास्तविक ओळखीसह त्यांची ऑनलाइन ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. खो गए हम कहाँ हा चित्रपट २६ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.