आधी ठिक होता पण आता... मलाइकाला अरबाजच्या 'या' सवयीची चीढ

19 वर्षांनंतर उलगडलं तुटलेल्या नात्यातील कटू सत्य 

Updated: Nov 9, 2021, 09:53 AM IST
आधी ठिक होता पण आता... मलाइकाला अरबाजच्या 'या' सवयीची चीढ  title=

मुंबई : अरबाज खान (Arbaaz Khan) सोबत घटस्फोट घेतल्यानंतरही मलाइका अरोरा (Malaika Arora) कायमच आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. मग ते अरबाजसोबतचा घटस्फोट असो किंवा अर्जुन कपूरसोबतच नवं नातं. मलाइकाचे अर्जुन कपूरसोबतचे देखील फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

मलाइकासोबतचे अनेक फोटो अर्जुन कपूर सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. मात्र घटस्फोटाअगोदर अरबाज आणि मलाइकाला बॉलिवूडमधील पावर कपल म्हणून ओळखले जात असतं. मात्र त्यांच्या घटस्फोटानंतर सगळ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

मलाइकाची तक्रार 

अरबाज आणि मलायका 2017 मध्ये वेगळे झाले. घटस्फोटाच्या कारणांवर कोणीही उघडपणे बोलले नाही, पण वेळोवेळी दोघांनीही आपले मतभेद जगासमोर मांडले. एकदा मलायका अरोरा शोमध्ये सर्वांसमोर म्हणाली होती की, ती अरबाजच्या एका सवयीमुळे नाराज आहे आणि ही सवय काळाबरोबर वाढत आहे.

मलाइकाला पसंत नाही अरबाजची ही सवय 

फराह खानचा भाऊ साजिद खान याला मलायका आणि अरबाजने मुलाखत दिली होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांची खूप प्रशंसा केली होती आणि अनेक वाईट गोष्टीही केल्या होत्या. येथे साजिद खान मलायकाला अरबाजबद्दल एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट सांगण्यास सांगतो. याला उत्तर देताना मलायका म्हणते, 'मला त्याची प्रेम करण्याची पद्धत सर्वात जास्त आवडते. तो त्याचे प्रेम कधीच व्यक्त करत नाही, पण तरीही मला समजते. कदाचित हे आमच्या नात्याच गुपित आहे. तो ज्या प्रकारे मला आनंदी ठेवतो आणि मला नेहमी हसवतो, हीच कदाचित अरबाजची सर्वात चांगली गोष्ट आहे.

मलाइकाला अरबाजच्या या सवयीमुळे येते चीड 

मलायका अरोरा पुढे म्हणते, 'आता मी त्यांच्याबद्दल म्हणजे त्याच्या सर्वात वाईट गोष्टीबद्दल बोलले तर तो खूप निष्काळजी आहे. तो कुठलीही वस्तू घरात कुठेही ठेवतो आणि यामुळे मी खूप अस्वस्थ झाले आहे. यापूर्वी त्याचा निष्काळजीपणा थोडा कमी होता, पण आता हळूहळू तो वाढत आहे. या प्रश्नावर अरबाज खान म्हणतो, 'मलायका अनेक गोष्टी व्यवस्थित सांभाळते. मलायका आपली चूक कधीच मान्य करत नाही. हे खरोखर मला खूप त्रास देते.

19 वर्षांचं नातं तुटलं 

मलायका अरोराने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केले होते. पण अरबाज खान आणि मलायका अरोरा त्यांच्या वैवाहिक जीवनातील चढ-उतारांमुळे 19 वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळे झाले. अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्यातील जवळीक वाढू लागली. अर्जुन आणि मलायका जेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आले, तेव्हापासून या दोघांच्याही चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या आहेत