ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नानंतर अशी होती सलमानची प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये चित्रपटांपेक्षा बॉलिवूडकरांच्या अफेयर्सबद्दल चर्चा तुफान रंगत असतात.

Updated: Jul 15, 2021, 09:38 AM IST
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नानंतर अशी होती सलमानची प्रतिक्रिया  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये चित्रपटांपेक्षा बॉलिवूडकरांच्या अफेयर्सबद्दल चर्चा तुफान रंगत असतात. बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आणि तेवढीचं वादग्रस्त जोडी ठरली ती म्हणजे अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री  ऐश्वर्या राय बच्चनची. दोघे वेगळे झाले असली तरी त्यांच्या अफेयरच्या चर्चा आजही तुफान रंगत असतात. ऐश्वर्या आणि सलमान दोघेही आयुष्यात फार पुढे गेले आहेत. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर  2007 सली ऐश्वर्याने अभिषेकसोबत लग्न केलं. तर सलमानच्या आयुष्यात अन्य अभिनेत्रींची एन्ट्री झाली. 

सध्या व्हायरल होत असलेल्या एका मुलाखतीत सलमानला, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा सलमानने त्याच्या उत्तराने सर्वांचं मन जिंकून घेतलं. सलमान म्हणाला, 'मला आनंद आहे ऐश्वर्याचं लग्न अभिषेकसोबत होत आहे.' शिवाय तेव्हा सलमानने अभिषेकचं कौतुक देखील केलं.

इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला, 'अभिषेक एक चांगला व्यक्ती आहे. त्याचं कुटुंब देखील फार छान आहे. मला त्याच्यासाठी सर्वात चांगली  गोष्ट  हवी ती म्हणजे त्याचं आनंदी आयुष्य.' आता सलमान आणि ऐश्वर्याचे मार्ग वेगळे झाले आहेत. पण जेव्हा सलमानच्या खासगी जीवनाबद्दल विचारलं जातं. तेव्ह ऐश्वर्याच्या उल्लेख होतोचं. 

सलमानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'सलमान सध्या 'टायगर 3' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेता इम्रान हश्मी आणि अभिनेत्री कतरिना कैफ देखील झळकणार आहे. तर ऐश्वर्या मणिरत्नमच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.