साखरपुडा नागा चैतन्यचा, इंटरनेटवर चर्चा फक्त समंथाची! गुगलवर लोकांना एकच प्रश्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा गुरुवारी सकाळी हैदराबादमध्ये पारंपारिक पद्धतीने साखरपुडा संपन्न झाला आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चा फक्त समंथाची आहे. काय आहे कारण? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 8, 2024, 07:44 PM IST
साखरपुडा नागा चैतन्यचा, इंटरनेटवर चर्चा फक्त समंथाची! गुगलवर लोकांना एकच प्रश्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Engagement: अभिनेता नागा चैतन्य आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा गुरुवारी सकाळी हैदराबादमध्ये पारंपारिक पद्धतीने  साखरपुडा झाला आहे. याची घोषणा नागा चैतन्य याचे वडील, ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

मात्र, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर अनेक चाहत्यांना पहिली पत्नी समंथा रुथ प्रभू काय प्रतिक्रिया देतेय याची उत्सुकता लागली आहे.

ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन यांनी शेअर केले फोटो

8 ऑगस्ट 2024 रोजी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा झाल्याचं अभिनेते नागार्जुन यांनी जाहीर केलं आहे. त्यांनी शोभिताचे त्यांच्या कुटुंबात स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी या साखरपुड्यातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे पारंपारिक पोशाखात दिसले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

2017 मध्ये समंथासोबत लग्न

समंथा आणि नागा चैतन्य यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर चार वर्षे त्यांच्यामध्ये मतभेद सुरु होते. अखेर त्यांनी 2021 मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर त्यांच्या नातेसंबंधाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केलं आहे. 

घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि शोभिता एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर दोघांच्या डेटींगच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या. अनेक वेळा ते दोघे एकत्र देखील दिसले. 

इंटरनेटवर चर्चा फक्त समंथाची

काही चाहत्यांनी असं म्हटलं आहे की, याच तारखेला समंथाने 2017 मध्ये नागा चैतन्यला प्रपोज केले होते. या योगायोगाने अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे की, समंथाने नागा चैतन्यच्या नवीन नात्याबद्दल सार्वजनिक टिप्पणी किंवा पोस्ट करेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या साखरपुड्यानंतर समंथाने कोणतेही विधान केले नाही. त्यामुळे चाहते देखील तिच्या प्रतिक्रियेची अतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, समंथा सोशल मीडियावर थेट टिप्पणी करते का हे बघावे लागणार आहे. त्यामुळे ती आता कोणती प्रतिक्रिया देते याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढतच आहे.