वजन वाढल्याने भाजीवालेही करायचे 'या' अभिनेत्रीची टिंगल; Looks मुळे ती मिडीयासमोर जाण्यासही घाबरायची

Sameera Reddy :  समीरा रेड्डीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पोस्टपार्टमनंतर तिच्याशी लोक कसे वागायचे तिला कसे बोलायचे याविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 13, 2023, 12:00 PM IST
वजन वाढल्याने भाजीवालेही करायचे 'या' अभिनेत्रीची टिंगल; Looks मुळे ती मिडीयासमोर जाण्यासही घाबरायची title=
(Photo Credit : Social Media)

Sameera Reddy : बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी ही नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येते. समीरा चर्चेत असण्याचं कारण हे तिच्या प्रेग्नंसीची किस्सा किंवा त्यानंतर काय झालं यामुळे असते. दरम्यान, समीरा आता तिच्या वजनामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 2015 मध्ये तिच्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या वाढत्या वजनामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर तिनं वक्तव्य केलं आहे. याविषयी सांगताना समीरा म्हणाली की भाजी विक्रेते देखील तिला ट्रोल करत तिची परिस्थिती कशी झाली याविषयी सांगितलं आहे. 

समीरानं नुकतीच Janice Sequeira च्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. यावेळी मुलाखतीत समीरा रेड्डीनं तिच्या पोस्टपार्टम बॉडीवर म्हणाली की लोक तिच्याविषयी काय काय बोलायचे. कशा कशा कमेंट तिच्यावर करायचे. अभिनेत्री म्हणाली की मला गरोदरपणामध्ये फार समस्यांचा सामना करावा लागला. 'पोस्टपार्टम ब्लूज' म्हणजेच गर्भधारणेदरम्यान किंवा बाळंतणी झाल्यानंतर येणारा मानसिक ताण मला आला होता. माझं वजनही फार वाढलं होतं. एवढाबदल झाल्यानंतरही लोक आधीसारखेच वागतील इतके ते दयाळू नसतात. भाजीवाला म्हणाला, दीदी तुम्हाला काय झालं ? दीदी नक्की तुचं आहेस? कधी कधी मला आश्चर्य वाटायटचं की मॅडम तुम्ही बदललात हे सांगण्याची हिंम्मत भारतीयांमध्ये कुठून येते? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समीरा रेड्डी म्हणाली की तिच्यावर अशा प्रकारच्या कमेंटचा परिणाम होत नाही. मला वाटतं की मी माझ्या विचारांमध्येच गुंतली आहे की लोक माझ्याविषयी काय विचार करतात. पापाराझी फोटो क्लिक करतात त्याला मी इतके घाबरले होते की बाहेर देखील येत नव्हती. आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा स्वत: कडे पाहून हाच विचार करते की समीरा तू तुझ्यासोबत असं का केलं? 

हेही वाचा : 'आई मला रामायण, महाभारत बघू देत नव्हती कारण...'; लोकप्रिय अभिनेत्रीकडून बालपणीच्या आठवणी सांगताना विचित्र खुलासा

समीरा रेड्डीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं 'रेस', 'डरना मना है', 'टैक्सी नंबर 9211', 'दे दना दन', 'आक्रोश', 'मुसाफिर', 'जय चिरंजीव', 'अशोक', 'वरनम आयिरम' आणि 'तेज' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. 2014 मध्ये समीरानं व्यावसायिक अक्षय वर्देशी लग्न केलं. त्यानंतर सनीरानं अभिनय क्षेत्राला रामराम केला. तर 2015 साली समीरानं तिच्या मुलाला जन्म दिला तर 2019 साली तिनं मुलीला जन्म दिला.