जेव्हा एकाच कार्यक्रमात पोहोचले कंगना आणि हृतिक

बॉलिवूडचे २ असे कलाकार ज्यांनी एकमेकांना दुर्लक्ष करणंच पंसद केलं आणि एकमेकांच्या आयुष्यात एकत्र येण्याआधीच लांब झाले.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 20, 2018, 01:56 PM IST
जेव्हा एकाच कार्यक्रमात पोहोचले कंगना आणि हृतिक title=

मुंबई : बॉलिवूडचे २ असे कलाकार ज्यांनी एकमेकांना दुर्लक्ष करणंच पंसद केलं आणि एकमेकांच्या आयुष्यात एकत्र येण्याआधीच लांब झाले.

हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या अफेअरच्या चर्चा बरेच दिवस बॉलिवूडमध्ये होत्या. पण नंतर त्यावरुन वाद झाला आणि हा वाद लोकांपर्यंत पोहोचला. पण १३ जानेवारीला हे दोघं एकमेकांच्या समोर आले.

१३ जानेवारीला मुंबई पोलिसांच्या उमंग २०१८ या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. पण जेव्हा कंगना आणि हृतिक जेव्हा एकमेकांसमोर आले तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे गेल्या.

कंगना या कार्यक्रमात आधीच पोहोचली होती. पण तिला याबाबत काहीही माहिती नव्हती की या कार्यक्रमात हृतिक देखील येणार आहेत. दोघे या कार्यक्रमात आले पण खूप सोप्या पद्धतीने त्यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. कंगना जसं माहित पडलं की, हृतिक या कार्यक्रमात येणार आहे. त्यानंतर तो येण्याआधीच ती कार्यक्रमातून निघून गेली.

हृतिकला कंगनामुळे अर्धातास वाट पाहावी लागली. कंगनाने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, हृतिकने तिला धोका दिला. दोघे रिलेशनशिपमध्ये देखील होते. हृतिकने लग्नाचं देखील आश्वासन दिलं होतं पण हृतिकने ते सर्व आरोप फेटाळले. कंगना आता पुन्हा लोकांसोबत आपलं नातं सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच ती मणिकर्णिका सिनेमात दिसणार आहे. हृतिक देखील सुपर ३० मध्ये व्यस्त आहे.