'गरोदर राहिले तर...' रेखानं पतीसमोर ही अट ठेवली आणि....

Rekha and Her Husband : रेखा यांनी त्यांच्या पती समोर एक अट ठेवली होती, जी ऐकल्यानंतर त्यांच्या पतीनं... 

दिक्षा पाटील | Updated: Jul 1, 2024, 03:15 PM IST
'गरोदर राहिले तर...' रेखानं पतीसमोर ही अट ठेवली आणि.... title=
(Photo Credit : Social Media)

Rekha and Her Husband : बॉलिवूडची चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक रेखा या त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या लाइफस्टाईलसाठी देखील ओळखले जातात. त्यांचे लाखो चाहते आहेत. त्या आज पडद्यापासून लांब असल्या तरी चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी प्रतिक्षा करतात. त्यांची प्रोफेशन्ल लाइफ जितकी चांगली आणि यशस्वी आहे. तेवढंच त्यांचं खासगी आयुष्य हे चांगल नव्हतं. त्यांनी दोन लग्न केली पण आजही त्या एकट्याच आहेत. लग्न केल्यानंतर 6 महिन्यात त्यांच्या पतीनं आत्महत्या केली. तर दुसऱ्याशी त्यांचं नातं तुटलं. 

त्यांच्या नवऱ्याच्या निधनासाठी तर त्यांनाच जबाबदार ठरवण्यात आलं. तर दुसऱ्याशी नातं तुटलं या सगळ्यासाठी रेखा यांना खूप काही ऐकावं लागलं. त्यांचे पती बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होते. त्यासाठी औषध देखील घ्यायचे. त्यांच्या डिप्रेशनची अनेक कारणं होती. त्यांच्या पैकी एक म्हणजे रेखा यांचं चित्रपटात काम करणं होतं. त्यांची इच्छा नव्हती की रेखा यांनी चित्रपटांमध्ये काम करावं. त्यांना रेखा यांच्यापासून लांब राहायला नव्हते. पण लग्नानंतर त्या जेव्हा पुन्हा कामावर परतल्या त्या बऱ्याच दिवसांसाठी बाहेरच राहायच्या. मुकेश अग्रवाल यांनी त्यांना यासाठी नकार दिला. तर रेखा यांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली आणि ती अट ऐकल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. 

रेखा यांच्या बायोग्राफीत खुलासा

रेखा यांच्या बायोग्राफी ‘रेखा: अनटोल्ड स्टोरी’ मध्ये रेखा आणि मुकेश यांनी सांगितलं की '1990 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यावेळी संपूर्ण देशाची अर्थ व्यवस्था ही चांगली नव्हती. याचा परिणाम मुकेश यांच्या बिझनेसवर देखील झाला. पण त्यांनी रेखा यांना त्याविषयी सांगितलं नाही. पण जेव्हा रेखा यांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली. त्यांचं लग्न दोन महिन्यात मोडलं. मुकेश यांना रेखा यांचे दूर जाणे सहन करु शकले नाही. त्यांची इच्छा होती की रेखा यांनी चित्रपटात काम करायला नको. रेखा यांनी केलेली एक मागणी त्यांच्या पतीला अमान्य होती.' 

रेखा यांनी पतीसमोर ठेवली 'ही' अट 

रेखा यांनी त्यांच्या पतीच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. त्यांनी मुकेश यांना सांगितलं की 'जेव्हा त्या प्रेग्नंट होतील तेव्हा त्या चित्रपटांमध्ये काम करण बंद करतील. त्यानंतर रेखा त्यांच्या कामात व्यग्र झाल्या. पण मुकेश यांची वागणुक दिवसागणिक वाढली. त्याची जाणीव त्यांना झालीच नाही. त्यानंतर त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला. मग काही काळातच मुकेश यांनी आत्महत्या केली.' 

हेही वाचा : 'मिर्झापूर 2' चे इंटीमेट सीन्स कसे शूट झाले? विजय वर्मा म्हणाला, 'पार्टनरकडून...'

मुकेश यांनी आत्महत्या केल्यानंतर रेखा यांना त्यांच्या हत्येसाठी जबाबदार ठरवण्यात आलं. त्यांच्या सासूनं देखील त्यांना खूप काही सांगितलं. त्यांनी सांगितलं की 'त्या डायननं माझ्या मुलाचा जीव घेतला. देव तिला कधीच माफ करणार नाही.' त्यासोबत रेखा यांच्या नवऱ्याचे मोठे भाऊ अनिल बजाज यांनी म्हटलं की 'माझ्या भावाचं रेखावर खूप प्रेम होतं. त्याच्यासाठी हेच सगळं काही होतं. रेखा जे करत होत्या ते त्याला सहन होत नव्हतं. आता तिला आमच्याकडून काय पाहिजे आमचे पैसे?'