शाहरूखने मुंबईत पाय ठेवताचं महिलेनी लगावली कानशिलात; कारण जाणून व्हाल थक्क

संपूर्ण जगात शाहरूखचे चाहते पसरले आहेत.   

Updated: May 10, 2021, 03:03 PM IST
शाहरूखने मुंबईत पाय ठेवताचं महिलेनी लगावली कानशिलात; कारण जाणून व्हाल थक्क title=

मुंबई : अभिनेता शाहरूख खान म्हणजे बॉलिवूडचा किंग खान. संपूर्ण जगात शाहरूखचे चाहते पसरले आहेत. बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रास्थापित करण्यासाठी प्रत्येक मोठ्या अभिनेत्याला खस्ता खावा लागला आहे. त्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शाहरूख खान. शाहरूख आज ज्या पदावर आहे, त्यामागे फक्त आणि फक्त त्याची मेहनत आणि चिकाटी आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे. मुंबईत येताचं एका महिलेने शाहरूखच्या कानशिलात लगावली होती. 

एक काळ होता जेव्हा शाहरूख स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुंबईत आला. पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर त्याला माहिती नव्हतं की ज्या ट्रेनमध्ये बसून तो मुंबईत आला आहे, ती ट्रेन बोरीवलीत पोहोचल्यानंतर लोकल ट्रेन होते. अशात जर कोणी शाहरूखच्या सीटवर बसला तर शाहरूख त्या व्यक्तीला ही माझी सीट आहे माझ्याकडे तिकिट आहे. 

अशा परिस्थितीत प्रवासी काही न बोलता सीटवरून उठायचे. मिळालेल्या माहितीनुसार एकदा शाहरूखने ट्रेनमध्ये एका महिलेला बसण्यासाठी जागा दिली. पण त्या महिलेच्या पती बसण्यासाठी नकार दिला. तेव्हा त्या महिलेला राग आला आणि तिने शाहरूखच्या कानशिलात लगावली. त्यानंतर ती महिला म्हणाली, 'ट्रेन सर्वांची आहे. आला मोठा रिझर्वेशनवाला.'  महिलेची वागणूक पाहून शाहरूख हैरान झाला आणि एका कोपऱ्यात विचार करू लागला की मुंबईत आपलं अत्यंत चांगल्या प्रकारे स्वागत झालं.