.. यामुळे आमीर - सलमान एकत्र काम करत नाहीत

काय आहे खरं कारण 

.. यामुळे आमीर - सलमान एकत्र काम करत नाहीत title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये जुन्या आठवणी आठवणं प्रत्येकालाच आवडतं असतं. प्रत्येकाचे आठवणीतले जुने सिनेमे असतात आणि त्यांच्या आठवणी. आमिर खान, सलमान खान, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर स्टारर फिल्म 'अंदाज अपना अपना'. 90 च्या दशकातील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र अगदी फ्लॉप ठरली. यानंतर सलमान खान आणि आमीर खानची जोडी पुन्हा एकत्र कधीच दिसली नाही. एवढंच काय तर या सिनेमानंतर रवीना आणि सलमान यांची जोडी देखील एकत्र आलेली नाही.

 

#throwback #andazapnaapna

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on

'अंदाज अपना अपना' हे नाव ऐकताच आपल्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होतात. मात्र हा सिनेमा फ्लॉप सिनेमातील एक ठरला आहे. मात्र असं असलं तरीही प्रेक्षकांनी हा सिनेमा भरपूर पसंद केला आहे. आमीर खान आणि सलमान खान यांची ऑनस्क्रिन जोडी खूप पसंद करण्यात आली. मात्र हा सिनेमा चित्रित होत होता तेव्हा सलमान आणि आमिर खानमध्ये हेल्थी वातावरण नसल्याचं स्पष्ट झालं होत. सलमान खान या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान भेदभाव करत असल्याचं समोर आलं. सलमान खान 24 वर्षापूर्वी या सिनेमांत नवीन अभिनेता म्हणून काम करत होता.

या सिनेमातील 'ये रात और ये दूरी' या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली आहे. हे गाणं सलमान, रवीना आणि करिश्मा यांच्यावर चित्रित केलं गेलं आहे. मात्र सलमान खानला असं वाटत होतं की, सरोज खान यांनी आमिर खानला चांगल्या स्टेप दिल्या आहेत. त्यामुळे आमिर खानच्या समोर सलमान खान फिका पडला. यावरून सलमान खान आणि सरोज खान यांच्यात खूप वाद झाला. यानंतर या दोघांनी देखील कधीच एकत्र काम केलं नाही.