Breakfast Ideas : 'या' गोष्टी सकाळी नाश्ट्यामध्ये खाणे तुम्हाला पडू शकते महागात...

हेल्दी नाश्ता न केल्याने तुमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो

Updated: Aug 18, 2021, 08:13 AM IST
Breakfast Ideas : 'या' गोष्टी सकाळी नाश्ट्यामध्ये खाणे तुम्हाला पडू शकते महागात... title=

मुंबई : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नाश्ता खूप महत्वाचा आहे. जर काही कारणास्तव ते चुकले तर संपूर्ण दिवस आळसात निघून जातो. म्हणूनत तर अशी म्हण आहे की, नाश्टा हा नेहमी राजा सारखा करावा म्हणजे, जरी तुम्ही दुपारी कमी जेवण जेवलात तरी त्याचा फायदा होतो. पण नाश्ता हा तुम्हाला करायलाच हवा. परंतु हेल्दी नाश्ता न केल्याने तुमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हे माहित असणे आवशक आहे की, नाश्ट्यात काय खायला पाहिजे? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे नाश्त्यामध्ये सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

पराठा आणि ब्रेड 

पराठा आणि ब्रेड हा असा एक नाश्ता आहे, जो सकाळी बहुतेक घरांमध्ये खाल्ला जातो. हे चवदार आहे, परंतु तितकेच ते आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते. तेलकट पदार्थ सकाळी खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्याच वेळी, ब्रेडमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असते. त्यामुळे पचन अन्नात त्याची गणना होत नाही. त्यामुळे सकाळी असा नाश्ता केल्याने पोटात गॅसची समस्या वाढते. त्यामुळे सकाळी ब्रेड किंवा पराठा खाणे टाळावे.

केळी

केळीला सुपरफूड मानले जाते. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता सारख्या पोटाच्या समस्या उद्भवत नाहीत. पण तज्ञांचे म्हणणे आहे की, सकाळी नाश्त्यासाठी केळी खाणे चुकीचे आहे. ते म्हणतात की, केळी खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियमच्या प्रमाणात असंतुलनता वाढते. याशिवाय हे फळ एसिडिक देखील आहे. त्यामुळे केळी तुमचे पाचन तंत्र प्रभावित होऊ शकते.

दही

बहुतेक आहारतज्ञ जेवणात दही खाण्याची शिफारस करतात, जे खूप फायदेशीर आहे. परंतु जर तुम्ही सकाळी नाश्त्यात दही खाल्ले, तर ते तुमचे नुकसान करेल. दहीमध्ये असलेल्या आंबटपणामुळे, सकाळी त्याचे सेवन केल्याने पोटात ऍसिडिटीची समस्या उद्भवू शकते. याशिवाय पित्त आणि कफ वाढवण्याचे गुण दहीमध्ये आढळतात. सकाळी त्याचे सेवन केल्याने खोकला आणि घसा दुखण्या सारख्या समस्या देखील होऊ शकतात.

टोमॅटो

कोणत्याही ब्रेकफास्ट डिशमध्ये टोमॅटो वापरणे टाळा. वास्तविक टोमॅटोमध्ये भरपूर आंबटपणा असतो. सकाळी लवकर याचे सेवन केल्याने अॅसिडिटी, छातीत जळजळ, पोटदुखी आणि गॅस होऊ शकतो.

लिंबूवर्गीय फळे

लिंबूवर्गीय फळे आणि इतर आंबट गोष्टी सकाळी खाऊ नयेत जसे लोणचे, चटणी, लिंबू, संत्री, हंगामी फळं इ. या सर्व गोष्टींमध्ये ऍसिड असते, ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवते.