तुम्ही देखील थंडीत कमी पाणी पिता? आताच सावध व्हा! 'हे' आजार बळावतील

Water in Winter : वातावरणात थोडा गारवा आला की, अनेकजण कमी पाणी पितात. गेल्या काही दिवसांपासून थंड वातावरण आहे. अशावेळी अनेकांमध्ये हा बदल होतो. पण हा बदल तुमच्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 10, 2023, 12:59 PM IST
तुम्ही देखील थंडीत कमी पाणी पिता? आताच सावध व्हा! 'हे' आजार बळावतील  title=

हिवाळ्यात बरेच लोक कमी पाणी पितात परंतु हे करू नये कारण आपल्या शरीरासाठी डिहायड्रेट राहणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, पिण्याचे पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. पाणी प्यायल्‍याने शरीर हायड्रेट होते आणि घाण निघून जाते, त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर हिवाळ्यात गरम पाणी प्यायल्याने अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. कमी पाणी पिण्याने मेंदूला किती नुकसान होऊ शकते, हे देखील जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

10 टक्के पाण्याच्या कमतरतेमुळे तहान लागते

आपल्या शरीरातील सुमारे 60% पाणी आहे आणि दररोज 2.5 लिटर पाणी शरीरातून बाहेर पडते. जेव्हा शरीरात 10 टक्के पाण्याची कमतरता असते तेव्हा तहान लागते. निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाणी पिणे महत्त्वाचे आहे. पाणी कधी, किती आणि कसे प्यावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

डोकेदुखी तुम्हाला त्रास देऊ शकते

कमी पाणी प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. पाणी कमी प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होतो, त्यामुळे पाणी प्यावे.

स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या

हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरातील डिहायड्रेशनचा धोका वाढतो. ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. अशा स्थितीत स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा धोका असतो.

ब्रेन स्ट्रोकचा धोका

डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो, ज्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील एक म्हणजे कमी पाणी पिणे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंड वातावरणात लोकांना कमी तहान लागते. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, डिहायड्रेट राहिल्यामुळे मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे पक्षाघाताचा धोका असतो.

एखाद्याने किती पाणी प्यावे

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात कमी पाणी प्यावे असे लोकांना वाटते, परंतु असे अजिबात नाही. हिवाळ्यात किमान 3-4 लिटर पाणी प्यावे, तर उन्हाळ्यात 7-8 ग्लास पाणी प्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उभे राहून पाणी पिऊ नये का?

उभं राहून पाणी पिऊ नये, पाणी हळू हळू प्यावं, असं तुम्ही अनेक लोकांकडून ऐकलं असेल. याबाबत आम्ही डॉक्टरांना विचारले असता त्यांनी असे कुठेही वाचले नसल्याचे सांगितले. मॅरेथॉन धावताना धावपटू धावत असतानाही पाणी पितात. ते नक्कीच म्हणाले की पाणी पिताना फक्त हे लक्षात ठेवा की पाणी मोकळेपणाने प्या, घाईघाईने पाणी प्यायल्याने समस्या उद्भवू शकतात.

किडनीवर परिणाम होतो

कमी पाणी पिल्याने किडनीवर गंभीर परिणाम होतो. याशिवाय किडनी स्टोन होण्याचा धोकाही वाढतो. किडनी व्यवस्थित काम करण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा किडनीला जास्त काम करावे लागते. त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा ट्रॅकमध्ये जळजळ होण्याची तक्रार असते.