दिवाळीत मिळणाऱ्या 5 मिठाई आरोग्यासाठी घातक, पोट बिघडून हालत होईल खराब

Diwali sweets: दिवाळी म्हटलं की, गोड पदार्थांची सरबत्तीच. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ली जाते. काही मिठाई आरोग्यासाठी धोकादायक देखील असू शकतात. शरीराला 5 मिठाई अतिशय घातक असल्याच तज्ज्ञ सांगतात. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 27, 2024, 03:03 PM IST
दिवाळीत मिळणाऱ्या 5 मिठाई आरोग्यासाठी घातक, पोट बिघडून हालत होईल खराब

Top 5 Unhealthy sweets on diwali:  दिवाळीतील मिठाईला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी एकमेकांना मिठाई देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. 'दिव्यांचा सण' म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि मिठाई हा आनंद आणि प्रेमाच्या अभिव्यक्तीचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. मिठाई हे आनंदाचे आणि उत्सवाचे प्रतीक मानले जाते. दिवाळीला आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांना मिठाई वाटण्याची परंपरा आहे. हे नाते गोड करण्याचे, कुटुंब आणि मित्रांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढवण्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. पण दिवाळीनिमित्त बाजारात अनेक प्रकारच्या मिठाई विकल्या जातात, मात्र यातील काही मिठाई भेसळ आणि जास्त साखर आणि कॅलरीजमुळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. या मिठाईमध्ये भेसळ होण्याची दाट शक्यता असून, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवाळीत सर्वात धोकादायक मानल्या जाणाऱ्या पाच मिठाई कोणत्या त्या पाहा? 

Add Zee News as a Preferred Source

मावा मिठाई

दिवाळीत बर्फी, पेडा, खवा मिठाई आदी माव्याच्या मिठाईची अधिक विक्री होते. यामध्ये भेसळयुक्त मावा किंवा सिंथेटिक मावा वापरला जातो, जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. भेसळयुक्त माव्यामुळे पोटाच्या समस्यांपासून ते अन्न विषबाधापर्यंत सर्व काही होऊ शकते. या माव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो.

चॉकलेट कोटेड मिठाई

चॉकलेट कव्हर मिठाई किंवा चॉकलेट फ्लेवर्ड मिठाई मोहक वाटू शकते. परंतु त्यामध्ये भरपूर साखर, कृत्रिम रंग आणि फ्लेवर्स असू शकतात. हे पदार्थ मुलांसाठी आणि प्रौढांसाठी हानिकारक असू शकतात, कारण ते वजन वाढवतात तसेच रक्तातील साखरेची पातळी प्रभावित करू शकतात.

चमचम आणि रसगुल्ला

रसगुल्ला आणि चमचम सारख्या मिठाई सिरपमध्ये भिजवल्या जातात आणि त्यात भरपूर साखर असते. या मिठाईच्या अतिसेवनामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि दातांच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय या मिठाईंमध्ये अनेकदा कृत्रिम रंग वापरले जातात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात.

सिल्वर वर्ख मिठाई 

मिठाईवर लावलेल्या चांदीच्या वर्ख दर्जावरही प्रश्न उपस्थित केले जातात. अनेक वेळा कामात खरी चांदी वापरली जात नाही आणि त्यात हानिकारक धातू वापरल्या जातात, जे शरीरासाठी विषारी असू शकतात. यामुळे यकृत आणि किडनीचे नुकसान होऊ शकते.

लाडू आणि जिलेबी

लाडू आणि जिलेबीसारख्या गोड पदार्थांमध्ये तेल आणि साखर भरपूर प्रमाणात असते. सण-उत्सवांदरम्यान ते मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते, ज्यामुळे वजन वाढते तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यांना आधीच हृदयाची समस्या किंवा मधुमेह आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः हानिकारक आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More