बिहारमध्ये बोट उलटल्याने 5 जणांचा मृत्यू, काही जण बेपत्ता

बिहारची राजधानी पटनामधील फतुहामध्य एका बोट गंगा नदीत उलटल्याने 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 31, 2018, 01:39 PM IST
बिहारमध्ये बोट उलटल्याने 5 जणांचा मृत्यू, काही जण बेपत्ता title=

पटना : बिहारची राजधानी पटनामधील फतुहामध्य एका बोट गंगा नदीत उलटल्याने 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.

काही जण बेपत्ता

या बोटीवर एकूण 15 लोकं होते. घटनेनंतर 6 लोकांना बाहेर काढण्यात आलं. तर काही लोकं अजूनही बेपत्ता आहेत.

बचावकार्य सरु

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. बिहार सरकारने मृताच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत घोषीत केली आहे.