ओवेसींची वादग्रस्त पोस्ट, म्हणाले मुघलांच्या बायका कोण होत्या?

असदुद्दीन ओवेसी यांच्या वादग्रस्त पोस्टने पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता.

Updated: May 24, 2022, 08:28 PM IST
ओवेसींची वादग्रस्त पोस्ट, म्हणाले मुघलांच्या बायका कोण होत्या? title=

मुंबई : भारतीय मुस्लीम आणि मुघलांच्या संबधांबाबत बोलताना असद्दुद्दीन ओवेसी यांनी ही वादग्रस्त पोस्ट केली आहे.  दुसरीकडे भाषणातून त्यांनी ताजमहल, ज्ञानवापीचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदींवर टीका केलीये. 

'भारतीय मुस्लिमांचं मुघलांशी नातं नाही'. मुघलांच्या बायका कोण होत्या ?. ओवेसींच्या या फेसबूक पोस्टनं संतापाची लाट आहे. 

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत वाद सुरू आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी आणि मथुराच्या शाही इदगाह मशिदीचे प्रकरण न्यायालयात आहेत. कुतुबमिनारचा मुद्दाही वेळोवेळी चर्चेत येत असतो. आग्राच्या ताजमहालमधील 22 बंद खोल्या उघडण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती, तीही फेटाळण्यात आली होती. कारण या सर्व गोष्टी इतिहासाशी संबंधित आहेत. आणि मध्यभागी मुघल काळ आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ज्ञानवापी प्रकरण औरंगजेबशी जोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. प्रकरण बाहेर आले तर पुढे जाईल, असेही ते म्हणाले होते. आता ओवेसींनी फेसबुकवर इतिहास आणि मुघल कालखंडाबद्दल पोस्ट केली आहे. भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी कोणताही संबंध नाही, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही, पण मुघल सम्राटांच्या पत्नी कोण होत्या ते सांगा, असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी गुजरातमधील सुरत येथे एका सभेला संबोधित करताना पुष्यमित्रांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध मंदिरांबद्दल भाजप का बोलत नाही, असेही म्हटले होते.

ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील औरंगाबादला भेट दिली होती. असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेत औरंगजेबाच्या समाधीचेही दर्शन घेतले. औरंगजेबाच्या कबरीवर पोहोचल्यावर ओवेसींनी चादर आणि फुले अर्पण केली होती. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने (भाजप) ओवेसी आणि ठाकरे सरकारविरोधात टीका सुरु केली होती.

ओवेसी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा अशी मागणी भाजप नेते राम कदम यांनी राज्य सरकारकडे केली होती. राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारला लोकांचा आवाज दाबण्यात आणि त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्याचे शौकीन असल्याचे म्हटले होते. हिंमत असेल तर ओवेसी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा, असे राम कदम यांनी उद्धव ठाकरे सरकारला आव्हान दिले होते.