आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ऐकल्यानंतर हमसून हमसून रडला आसाराम

न्यायालयाच्या निकालानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिलीय. 

Updated: Apr 25, 2018, 04:08 PM IST
आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ऐकल्यानंतर हमसून हमसून रडला आसाराम  title=

जोधपूर : बलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. जोधपूर कोर्टानं हा महत्त्वाचा निकाल दिलाय... तर अन्य दोन दोषींना वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.  निकाल ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. दरम्यान, या  शिक्षेला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं आसारामच्या प्रवक्त्या निलम दुबे तसंच त्याच्या वकिलांनी म्हटलंय. 

भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं ढोंग करणा-या या आसारामच्या चेह-यामागे दडलेला काळा चेहरा समोर आला आणि एकच खळबळ उडाली.  15 ऑगस्ट 2013 मध्ये आसारामनं एका अल्पवयीन मुलीवर आसारामनं बलात्कार केला. त्यानंतर त्याच्या या गुन्ह्यांची यादी वाढतच गेली... आसारामवर धर्मगुरु बनून बलात्कार, अपहरण, मानवी तस्करी,  बलात्कारासाठी अपहरण करणे, अश्लील चाळे करणे, धमकी देणे, महिलांचा स्वाभिमान दुखावणे या सगळ्या आरोपांप्रकरणी आसारामला दोषी ठरवण्यात आलंय. न्यायालयाच्या निकालानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिलीय. 

ती तारीख होती 15 ऑगस्ट 2013... सगळा देश स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात रंगला होता... त्याचवेळी हा आसाराम जोधपूरमधल्या मणाई गावातल्या त्याच्याच आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर करत होता. आसाराम मुलींना भूतप्रेताची भीती दाखवायचा. अशीच भीती दाखवत त्यानं अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले... या कामासाठी आसारामचे साथीदार शिल्पी आणि शरदही त्याला मदत करायचे...  

याच शिल्पीनं पीडित मुलीला भूतबाधा झाल्याचं तिच्या आई वडिलांना सांगितलं. या पीडित मुलीचे आई वडील आसारामला अक्षरशः देव मानायचे... ते तिला घेऊन मणाई आश्रमात आले... आसारामनं तिच्या आई वडिलांना रात्रभर आश्रमातल्या एका कुटीबाहेर थांबायला सांगितलं आणि रात्रभर मुलीवर बलात्कार राहिला... मुलीनं हा सगळा प्रकार आई वडिलांना सांगितल्यावर दिल्लीमध्ये 20 ऑगस्टला गुन्हा नोंदवण्यात आला... त्यानंतर 31 ऑगस्ट 2013 ला आसारामला इंदूरमधल्या आश्रमातून अटक करण्यात आली. आसारामवर खटला सुरू झाल्यानंतर 9 साक्षीदारांवर हल्ले झाले, त्यात तिघांचा मृत्यू झालाय.

महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना लाखो लीटर पाण्याची नासाडी याच आसारामबापूनं केली.... अशी अनेक वादग्रस्त प्रकरणात आसाराम बापूच्या नावावर आहेत... अखेर सेहत के लिए हानिकारक या बापूला चांगलीच अद्दल घडलीय.