भाजप नेता बरळला, महिला पत्रकारांवर वादग्रस्त वक्तव्य

भाजपच्या आणखी एका नेत्याने महिलांबाबत वादग्रस्त व्यक्त केल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे. 

Updated: Apr 20, 2018, 07:04 PM IST
भाजप नेता बरळला, महिला पत्रकारांवर वादग्रस्त वक्तव्य title=

चेन्नई : भाजपच्या आणखी एका नेत्याने महिलांबाबत वादग्रस्त व्यक्त केल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे. महिला पत्रकार म्हणून काम मिळवायचे असेल तर त्या सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. माध्यमांमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवतात आणि महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहोचतात. तसे केले नाही तर त्या मोठी पदावर पोहचू शकत नाहीत. एवढेच काय त्या शारीरिक संबंध ठेवल्याशिवाय वृत्तनिवेदकही होऊ शकत नाहीत, असे वादग्रस्त व्यक्तव्य केलेय. त्यामुळे या वक्तव्यांने भाजपची डोकेदुखी वाढलेय.

खालच्या पातळीवरचे भाष्य

 भारतीय जनता पक्षाचा नेता एस. व्ही. शेखर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मात्र, त्यानंतर मोठी टीका होऊ लागल्याने ही ही पोस्ट  फेसबूकवरून डिलीट करण्यात आली आहे. एस. व्ही. शेखर यांनी फेसबूकवर 'मदुराइ युनिव्हर्सिटी, गव्हर्नर अँड द व्हर्जिन चिक्स ऑफ ए गर्ल' या शिर्षकाखाली पोस्ट लिहिली होती. पोस्टमध्ये महिला पत्रकारांबाबत अत्यंत वादग्रस्त आणि खालच्या पातळीवरचे भाष्य केलेय.

माध्यमांमधील मोठे पद मिळविण्यासाठी 

महिला पत्रकार काम मिळवायचे असेल तर सेक्स करण्यासही राजी होतात. प्रसार माध्यमांमधील मोठे पद मिळविण्यासाठी मोठ्या पदावरील व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवतात आणि त्या पदापर्यंत पोहोचतात. तसेच तामिळनाडूतील प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे लोक चांगले नाहीत. हीन आणि नीच दर्जाचे आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच काही चांगली माणसे आहेत. त्यांचा मी आदर करतो, असेही त्यांनी म्हटलेय. 

पोस्टवरून मोठा वादंग 

दरम्यान, शेखर यांच्या पोस्टवरून मोठा वादंग निर्माण झाल्याने ही पोस्ट हटविण्यात आलेय. शेखर यांचा निषेध करण्यासाठी महिला पत्रकारांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. तामिळनाडूच्या पत्रकारांनी शेखर यांच्याविरोधात तक्रारही केली आहे. नेटिझन्सनी शेखर यांना ट्रोल करत त्यांच्यावर जोरदार टीका केलेय. मात्र, प्रकरण आंगाशी आल्यानंतर शेखर यांनी मला तसे म्हणायचे नव्हते, असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे.  

दरम्यान, तामिळनाडूत राज्यपालांनी महिला पत्रकाराच्या गालाला हात लावला होता. त्यावरुनही वाद निर्माण झाला होता. महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन संताप व्यक्त केला होता. तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यानंतर पुरोहित यांनी लेखी माफी मागितली.