Corona: देशातील 18 जिल्ह्यांनी वाढवली चिंता, महाराष्ट्रतील इतक्या जिल्ह्यांचा समावेश

कोरोनाचे निर्बंध शिथिल केले गेले असले तरी कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.

Updated: Aug 3, 2021, 07:51 PM IST
Corona: देशातील 18 जिल्ह्यांनी वाढवली चिंता, महाराष्ट्रतील इतक्या जिल्ह्यांचा समावेश  title=

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. दररोज 100 पेक्षा जास्त प्रकरणे असलेल्या जिल्ह्यांमध्येही घट झाली आहे. 1 जून रोजी देशात 279 जिल्हे होते जेथे दररोज 100 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली जात होती, परंतु आता ती संख्या 57 जिल्ह्यांवर आली आहे. corona Cases raise in 18 districts of india

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल ( Lav Agrawal ) यांनी सांगितले की, सध्या केवळ 57 जिल्ह्यांमध्ये दररोज कोरोनाचे 100 पेक्षा जास्त प्रकरणांची नोंद होत आहे. ते म्हणाले की 222 जिल्ह्यांमध्ये प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. केवळ मर्यादित क्षेत्रात प्रकरणे वाढत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने ( Health Ministry ) सांगितले की, केरळच्या 10 जिल्ह्यांसह 18 जिल्हे आहेत जिथे कोरोनाच्या वाढत्या घटनांचा कल दिसून येत आहे. या 18 जिल्ह्यांमध्ये 47.5% प्रकरणे आहेत. ते म्हणाले की, 44 जिल्हे आहेत जेथे पॉझिटिव्ह रेट 10%पेक्षा जास्त आहे. हे जिल्हे केरळ, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये आहेत. केरळमध्ये 10, महाराष्ट्रात 3 आणि मणिपूरमध्ये 2 जिल्हे आहेत.

महामारी अजून संपलेली नाही

लसीकरणाबाबत सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशात आतापर्यंत एकूण 47.85 कोटी डोस देण्यात आले आहेत, ज्यात 37.26 कोटी पहिला डोस आणि 10.59 कोटी दुसरा डोस समाविष्ट आहे. आम्ही मे महिन्यात 19.6 लाख आणि जुलैमध्ये 43.41 लाख डोस दिले.

ते म्हणाले की, अशी काही राज्ये आहेत जिथे 3 कोटींहून अधिक लसीकरणाचे डोस पुरवले गेले आहेत. उत्तर प्रदेशला 4.88 कोटी डोस, महाराष्ट्राला 4.5 कोटी आणि गुजरातला 3.4 कोटी डोस देण्यात आले आहेत.

लव अग्रवाल म्हणाले की, जगभरात मोठ्या संख्येने कोरोनाची प्रकरणे नोंदवली जात आहेत आणि साथीचा आजार अद्याप संपलेला नाही. भारतात दुसरी लाट अजून संपलेली नाही.

'अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि भारतात सरासरी संख्या 1.2 आर आहे. याचा अर्थ असा की एक संक्रमित व्यक्ती एकापेक्षा जास्त लोकांना संक्रमित करत आहे. भारतातील 8 राज्यांमध्ये आर संख्या अधिक आहे.

ते म्हणाले की, हिमाचल प्रदेशातील परिस्थिती या आधारावर संवेदनशील आहे. येथे केसेस वाढत आहेत. हिमाचल प्रदेशात हा दर 1.4 आर आहे तर महाराष्ट्रात सर्वात कमी 1 आर आहे.