फाळणीला नेहरु, पटेल, आझाद जबाबदार - अब्दुल्ला

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भारत पाकिस्तान फाळणीबाबत धक्कादायक विधान केलंय. 

Updated: Mar 4, 2018, 12:24 PM IST
फाळणीला नेहरु, पटेल, आझाद जबाबदार - अब्दुल्ला title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भारत पाकिस्तान फाळणीबाबत धक्कादायक विधान केलंय. 

या फाळणीला मोहम्मद अली जिना नाही तर नेहरु आणि सरदार पटेल जबाबदार असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटलंय. भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी व्हावी अशी जिनांची इच्छा नव्हती असं त्यांनी म्हटलंय. 

अल्पसंख्यांकांना विशेष अधिकार मिळावेत असं जिना यांना वाटत होतं. मात्र त्याला नेहरु, पटेल आणि मौलाना आजाद यांनी विरोध केल्याने देशाची फाळणी झाल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटलंय.