Crime News: प्रेमसंबंधांतून संपूर्ण कुटुंब संपलं! 5 मुलांसहीत 7 जणांनी कालव्यात उडी मारुन संपवलं आयुष्य

Rajastan Family Death: राजस्थानच्या संचोर (Sanchor News) या गावात राहणाऱ्या एकाच कुटुंबांतील 7 जणांनी एकाच वेळी नर्मदेच्या कालव्यात (Death Near Naramda River) उडी मारत जीव दिला आहे. या घटनेमुळे गावात अक्षरक्ष: खळबळ उडाली आहे. या घटनेनं त्याच्या आप्तांना धक्का बसला आहे त्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे. एकाच चितेवर सातही जणांना जाळलं आहे. 

Updated: Mar 4, 2023, 01:19 PM IST
Crime News: प्रेमसंबंधांतून संपूर्ण कुटुंब संपलं! 5 मुलांसहीत 7 जणांनी कालव्यात उडी मारुन संपवलं आयुष्य title=
Rajasthan Crime news a family of 7 people dies in narmada kalva after husband and wife conflict over wifes extra matrial affair crime news in marathi

Rajasthan Crime News: 2023 हे वर्षही गुन्हेगारीच्या (Crime news in 2023) बाबतीत थांबण्याचे नावं घेत नाहीये. 1 जानेवारीच्या कांझावला (Kanzwala) येथील भीषण हत्याकांडानंतरही भारताच्या अनेक भागांत हत्या, आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळीकडे अशा घटनांचे पडसाद उमटत आहेत. त्यातून आता अशीच एक धक्कादायक घटना (Shocking News) ही नर्मदेच्या कालव्याच्या नजीक घडली आहे. एकाच कुटुंबातील 7 जणांनी कालव्यात उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यामुळे या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. ही घटना राजस्थान येखील असून इथल्या एका कुटुंबियांतील पती पत्नीच्या वादामुळे घरातील सगळ्यांचेच प्राण गेले आहेत. एका कॉल रेकॉर्डनं हा घात केला असल्याचे समोर आले आहे. परंतु नक्की असं काय झालं ज्यामुळे ही घटना घडली? (Rajasthan Crime news a family of 7 people dies in narmada kalva after husband and wife conflict over wifes extra matrial affair crime news in marathi)

समोर आलेल्या माहितीनुसार, या केसमध्ये पत्नीचे घरापाशीच राहणाऱ्या दुसऱ्या एका इसमाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे आपल्या पत्नीचे दुसऱ्याच पुरूषाशी प्रेमसंबंध (Extra Maritial Affairs) असल्याचे कळताच पतीनं याबद्दल पत्नीला अनेकदा चौकशीसाठी (Police Investigation) बोलावले होते. त्यामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. यासंदर्भात ग्रामपंचायतीतही या पतीनं आपल्या कुटुंबातील या समस्येची व्यथा मांडली होती परंतु त्यातून फार काही पदरी पडले नव्हते त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद सुरू होते. या दोन पती-पत्नींना 5 मुलंही होती. 

काय घडली घटना? 

आपल्या परिवारासोबत मोकळा वेळ घालवावा या अर्थानं ते दोघंही आपल्या 5 चंही अपत्यासंह फिरायला गेले होते. परंतु त्या प्रवासात असे अचानक काय घडले काय त्या दोघांनी आपल्या पाचही मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी मारत जीव दिला आहे. त्या सर्वाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे त्यातून मृत पतीच्या भावानं पत्नीच्या प्रियकराविरूद्ध (Family Dies in River in Rajasthan) पोलिसात तक्रार केली असल्याचे सांगितले आहे. त्यातून या प्रकरणाचा सखोल तपासही पोलिस घेत आहेत. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, एकाच चितेवर सात जणांना मुखाग्नी दिला आहे. 

नक्की काय होता प्रकार? 

या प्रकरणाची सुरूवात पत्नीचे असलेले विवाहबाह्य संबंध हे होते. एकदा पत्नीचे फोनवरचे बोलणे त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं ऐकले आणि त्यामुळे एकेदिवशी तिचा मोबाईल चोरून तिच्या फोनमधील रेकॉर्डींग ऑन केले आणि पुढच्या वेळी तिचे कॉल्स रेकॉर्ड (Call Recording) झाले त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. पतीनं तिला बजावलेही की त्याच्याशी परत बोलायचे नाही परंतु पत्नीनं ते काही ऐकले नाही त्यांचे संबंध  सुरूच राहिले आणि मग त्यावरून पती-पत्नीमध्ये भांडणं सुूरू झाली. त्या दिवशीही तेच झाले असावे. परंतु परिवारानं एकत्र जीव का दिला याचा तपास अजून लागला नाही.