सचिन पायलट यांच्यापुढे आहेत हे ५ पर्याय

उपमुख्यमंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद गेल्यानंतर काय आहेत पर्याय

Updated: Jul 15, 2020, 08:43 AM IST
सचिन पायलट यांच्यापुढे आहेत हे ५ पर्याय title=

जयपूर : सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राजस्थानमध्ये राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. पायलट यांचे आपत्कालीन लँडिंग आणि क्रॅश लँडिंगऐवजी तिचे सुरक्षित लँडिंग काय असावे याबाबत आता लोकांमध्ये चर्चा जोरात सुरू आहे. लोकांमध्ये आता हिच चर्चा आहे की, पायलट यांचं आता नेमकं काय होईल.

उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर सचिन पायलट यांच्याकडे एकूण 5 पर्याय आहेत.

१. काँग्रेसमध्ये दबाव बनवणे

पहिला पर्याय म्हणजे काँग्रेसमध्ये अर्थात त्यांच्या वयाचे युवा नेते असलेल्या दबावगटाद्वारे काँग्रेसमध्ये सन्माननीय स्थानासाठी दबाव बनवणे. काँग्रेसमध्ये जतिन प्रसाद, प्रिया दत्त, दीपेंद्र हूडा आणि मिलिंद देवरा अशी अनेक तरुण नेते आहेत आणि सचिन पायलट यांना सन्मान मिळावा आणि ते काँग्रेसमध्येच राहिले पाहिजेत यासाठी सतत प्रयत्नशील असतात. या संकटाच्या घटनेत त्यांचे सहकारी काँग्रेस हाय कमांडवर दबाव आणू शकतात.

२. आणखी आमदारांचा पाठिंबा

जर अशोक गेहलोतमुक्त काँग्रेस करण्याचं काम अयशस्वी ठरले असेल तर त्यांनी काँग्रेसमध्येच रहावे आणि बंडखोर झालेल्या आमदारांची संख्या 25 च्या वर जाईपर्यंत सभागृहात पुन्हा प्रयत्न करावेत. कारण त्यांच्याकडे आमदारांचं पाठबळ असेल तरच ते अशोक गेहलोत यांना पदावरुन खाली आणू शकतात. जर पक्षाकडून व्हीप जारी केला गेला आणि ते आणि त्यांचे आमदार त्याचे उल्लंघन करतात तर पक्षाचे सदस्यत्व आणि आमदारपदाचे देखील नुकसान होऊ शकते.

३. स्वतंत्र संघटना

सचिन पायलट यांच्यासोबत असलेल्या आमदारांना जर पक्षाच सदस्य आणि आमदारपद जाण्याची भीती नसेल तर त्यांनी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी स्वतंत्र संघटना किंवा आघाडी तयार करावी. सचिन पायलट यांनी त्या संघटनेचे नेतृत्व केले पाहिजे. सद्यस्थितीत हा पर्याय योग्य मानला जात आहे की सचिन पायलट यांनी आपला सन्मान जपण्यासाठी स्वतःच्या मार्गाने जावे.

राजस्थानमध्ये अशा जवळपास 30 जागा आहेत जिथे सचिन पायलट यांचा प्रभाव आहे. गुर्जर-बहुल जागांवर पायलट आपले उमेदवार निवडून आणू शकतात. त्याशिवाय गुर्जर बहुल भागात मुसलमान व मीना लोकसंख्या जास्त असल्याने मुस्लीम लोकसंख्या आणि अनुसूचित जमातीच्या मीना जागांवर उमेदवार विजयी होऊ शकतात. याशिवाय त्यांच्यात दीपेंद्रसिंह यांच्यासारखे राजपूत नेते आणि विश्वेंद्र सिंह यांच्यासारखे जाट नेते आहेत. जे संघटना अधिक मोठे करण्यासाठी योगदान देऊ शकतात.

४. भाजपमध्ये प्रवेश

पायलट यांच्याकडे चौथा पर्याय आहे की त्यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना समजावून सांगितले पाहिजे की, ते भाजपमध्ये आपल्या सन्मानाचे रक्षण करतील आणि त्यांना भाजपमध्ये सहभाग करुन घेतील. परंतु अडचण अशी आहे की सचिन पायलट यांच्यासोबत असलेल्या बऱ्याच आमदारांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा नाही.

हेमाराम चौधरी, दीपेंद्रसिंह आणि मास्टर भंवरलाल शर्मा हे सत्तरी ओलांडलेले नेते आहेत ज्यांना भाजप सोबत जाण्याची इच्छा नाही कारण त्यांचे असे मत आहे की आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता भाजपमध्ये जाऊन काय करतील. याशिवाय त्यांना आपल्या मुलांच्या भविष्याबद्दलही काळजी आहे. त्यांच्या मुलांना कदाचित भाजपमध्ये सन्मान मिळणार नाही. ज्यामुळे त्यांचा वारसा पुढे जावू शकणार नाही.

५. पुन्हा निवडणूक

पाचवा आणि शेवटचा संभाव्य पर्याय म्हणजे आणखी आमदारांना सोबत घेऊन त्यांचं हे सरकार पाडलं. तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावून नव्या सरकारसाठी प्रयत्न करावे.