नुसतं मेहनतीने नाही तर योग्य नियोजनातून मिळतं यश, संघर्षातून मीरा बनली IAS

सतत अपयश येऊनही हार मानली नाही आणि परीक्षा उत्तीर्ण करुनच दाखवली. 

Updated: Nov 3, 2021, 10:51 PM IST
नुसतं मेहनतीने नाही तर योग्य नियोजनातून मिळतं यश, संघर्षातून मीरा बनली IAS title=

IAS Success Story : तुम्ही UPSC उमेदवारांच्या अनेक यशोगाथा वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशा संघर्षाची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्यांनी सतत अपयश येऊनही हार मानली नाही आणि परीक्षा उत्तीर्ण करुनच दाखवली. आम्ही बोलत आहोत मीरा बद्दल, जिने UPSC 2020 च्या परीक्षेत AIR-6 वा क्रमांक मिळवला.

केरळमधील मीराने त्रिशूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक. केल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली, तीनदा अपयशी ठरली, पण चौथ्यांदा यश मिळवले. या काळात ती अनेकदा अपयशी ठरली, पण तिने हार मानली नाही. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आणि त्याची प्रेरणा कायम ठेवण्यासाठी तिने कोणत्या टिप्स दिल्या आहेत ते येथे जाणून घ्या.

मीराने सांगितले की, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, सर्व उमेदवारांनी प्रथम यूपीएससी प्रीलिम्स परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करत रहा, वृत्तपत्रे वाचा आणि NCERT पुस्तकांच्या मदतीने तुमचा पाया मजबूत करा. भूगोलाकडे विशेष लक्ष द्या, प्रिलिम्सच्या उजळणीसाठी छोट्या नोट्स बनवा. तुमच्या क्षमतेनुसार रणनीती बनवा आणि योग्य मार्गावर जा.

तुमची मेहनत चालू ठेवा
मीराने सांगितले की, यूपीएससीच्या तयारीसाठी तिने प्रथम अभ्यासक्रम समजून घेतला आणि तिचे अभ्यास साहित्य तयार केले. ती सांगते की, उत्तम नियोजन करून तयारी करूनच मेहनत घेतली पाहिजे. अपयश येणारच, पण त्या अपयशातून शिकून पुढे गेल्यास यश नक्की मिळेल.

यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ती म्हणाली की, प्रत्येकाने चांगले नियोजन करून पुढे जावे. जर तुम्ही दररोज प्रयत्न केले नाही तर तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकणार नाही. त्यांच्या मते, यशासाठी कठोर परिश्रम, योग्य नियोजन, जास्तीत जास्त उजळणी, उत्तर लेखनाचा सराव, सकारात्मक दृष्टीकोन आणि दरम्यानचे मनोरंजन हे खूप महत्वाचे आहे.