लग्नानंतर मुलींचीच पाठवणी का होते? कारण अध्यात्म की सामाजिक मान्यता?

Relationship : विवाहसंस्थेतील अनेक समजुतींमागे काही खास कारणं असतात. प्रत्येक प्रथेचं महत्त्वं असतं. लेकीची पाठवणी केली जाण्यामागेही अशीच काही कारणं आहेत... काय आहेत ती कारणं?   

सायली पाटील | Updated: Oct 4, 2024, 03:37 PM IST
लग्नानंतर मुलींचीच पाठवणी का होते? कारण अध्यात्म की सामाजिक मान्यता?
Why Only Girls Go To Their Husbands House After Marriage know all reasons

Relationship : लग्नानंतर प्रत्येक मुलीचीच पाठवणी का केली जाते? मुलं का नाही सासरच्यांच्या घरी जाऊन राहत? हे असे प्रश्न अनेकदा उपस्थित केले जातात. कारण, आजपर्यंत समाजात लग्नानंतर मुलीचीच पाठवणी होण्याची रित प्रचलित असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? 

Add Zee News as a Preferred Source

लग्नबंधनात असणारी ही रित नेमकं काय सुचवू पाहते? काही कल्पना आहे का? हिंदू विवाहसंस्कृतीनुसार कन्यादानाच्या विधीमध्येच या प्रश्नाचं उत्तर मिळतं. या विधीदरम्यान आईवडिल मुलीला दान स्वरुपात सासरच्यांकडे देत नाहीत, तर ते आपल्या जबाबदारीतून मुक्त होत वराकडे मुलीची जबाबदारी सोपवतात. 

मनु संहितेनुसारसुद्धा पत्नीच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करणं, तिची काळजी घेणं ही पतीची जबाबदारी असल्याची धारणा आहे. या महान ग्रंथानुसार पत्नी लग्नानंतर पतीच्याच घरी जाते. ज्यानंतर पत्नीला आजन्म आनंदात ठेवणं ही पतीचीच जबाबदारी ठरते. आणखी एका वैदिक तथ्यानुसार स्त्री ही देवीचं रुप असते. ती लक्ष्मी, अन्नपूर्णा असून तिच अनेकांची हितचिंतक आहे. लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर हीच पत्नी सासरच्या घरची जणू लक्ष्मी असते. त्यामुळं या देवीस्वरुप लक्ष्मीला सोबत आणण्याची प्रथा आहे. लग्नानंतर जर पतीनं पत्नीला माहेरीच सोडलं तर वैदिक उल्लेखांनुसार हे पाप ठरतं. 

हेसुद्धा वाचा : बाळाला दूध पाजायचं असेल तर, घरी जा! ऐकताच 'तिने' Breastfeed करतानाचा Photoच व्हायरल केला आणि...

अथर्ववेदातील संदर्भांनुसार वधू वरासाठी एखाद्या नदीसमान असते. एक अशी नदी जी तिच्या सागरासारख्या घरात जाऊन तिथं आपलं पावित्र्य मिसळते. लग्नानंतर सासरी गेलेली वधू तिच्या पतीच्याच कुटुंबाकडे स्वत:चं कुटुंब म्हणून पाहते आणि तिच्या अपत्यांपासून त्यांच्या पिढीची सुरुवात होते. विश्वाच्या रितीनुसार पत्नी लग्नानंतर पतीच्या घरी वास्तव्यास येते.

(वरील माहिती उपलब्ध संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.) 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More