लांडग्यांच्या हल्लात ४५ मेंढ्यांचा मृत्यू

मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान

Updated: Sep 20, 2019, 12:49 PM IST
लांडग्यांच्या हल्लात ४५ मेंढ्यांचा मृत्यू title=
संग्रहित फोटो

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातील हिवतड येथे लांडग्यांच्या हल्ल्यात ४५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

शेतात बसवलेल्या मेंढ्यांवर मध्यरात्री लांडग्यांच्या कळपाने हल्ला केला. ४५ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने, मेंढपाळ सतीश शेळके यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मेंढपाळ सतीश शेळके हे कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीवाडी येथील रहिवासी आहेत. मेंढ्या शेतात बसवण्यासाठी, आटपाडी तालुक्यातील हिवतड या गावात ते आले होते. हिवतड येथील खांडेकर मळा येथील शेतात त्यांनी मेंढ्या बसवल्या होत्या. मात्र मध्यरात्री ८ ते १० लांडग्यांनी मेंढ्यांवर हल्ला केला. यात ४५ मेंढ्या मृत्यमुखी पडल्या.