अजित पवार यांची राज्य सरकारवर जोरदार टीका

 राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सुरु केलेला संप हे सरकारचं इतिहासातलं मोठं अपयश असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Updated: Jun 5, 2017, 08:28 AM IST
अजित पवार यांची राज्य सरकारवर जोरदार टीका title=

इंदापूर :  राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सुरु केलेला संप हे सरकारचं इतिहासातलं मोठं अपयश असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनात फुट पाडण्यात भाजपचा हातखंडा असून आताही तोच प्रयत्न होत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. 

जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.  इंग्रज आणि मोघलांच्या काळातही नव्हती, इतकी वाईट परिस्थिती भाजप सरकारच्या काळात आल्याची टीका अजित पवार यांनी केली.