राफेल प्रकरण : काँग्रेस सत्तेत आल्यास मोदी, अंबानी तुरुंगात - पृथ्वीराज चव्हाण

मोदी यांनी राफेल करारा दरम्यान अनिल अंबानी यांच्या कंपनीला ऑफसेट कंत्राट मिळवून दिले. हे सर्व घोटाळेबाज तुरुंगात असतील, असे पृथ्वाराज चव्हाण म्हणालेत.

Updated: Apr 13, 2019, 10:07 PM IST
राफेल प्रकरण : काँग्रेस सत्तेत आल्यास मोदी, अंबानी तुरुंगात - पृथ्वीराज चव्हाण title=

औरंगाबाद : उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स अटलांटिका फ्लॅग या फ्रान्सस्थित कंपनीला जवळपास १५० दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे १२०० कोटी रूपयांचा कर भरणा करण्यास तेथील कर विभागाने सांगितले. हा कर भरणा २०१२ ते २०१५ पर्यंतचा होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारा दरम्यान अनिल अंबानी यांच्या कंपनीला ऑफसेट कंत्राट मिळवून दिले. त्यानंतर फ्रान्स सरकारच्या कर विभागाने कर माफी करत कराची रक्कम ११०० करोडने कमी केली, असा गौप्यस्फोट आज एका राष्ट्रीय फ्रेंच दैनिक 'ले मॉंड'ने केल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. त्याचवेळी सर्व घोटाळेबाज तुरुंगात असतील, असे चव्हाण म्हणालेत.

हे सगळे तरुणांगत असतील

राफेल विमान सौदा प्रकरणाची एनडीएच्या नेतृत्वाखाली सरकारने चुकीची आणि अपूर्ण माहिती दिली आणि सर्वोच्च न्यायालयाचा भ्रमनिरास केला. आता सर्वोच्च न्यायालयाने अरुण शौरी यांच्याद्वारे दाखल केलेल्या पुनरावलोकनाची याचिका स्वीकारली. आणि न्यायालयाने हिंदू वृत्तपत्रांत प्रकाशित केलेल्या पुराव्याप्रमाणेच चोरी झालेले कागदपत्र स्वीकारले आहे. राफेल कराराची सुनावणी सुरु केली. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनिल अंबानी आणि या करारात सहभागी असलेले नोकरशहा राफेल विमान घोटाळ्याच्या व्यवहाराच्या संदर्भात तुरुंगात असू शकतात, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.

एनडीएला जनता कंटाळली

देशाचे जनता एनडीए सरकारला कंटाळले आहेत. जे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात, जीएसटी अंमलबजावणी, नोटाबंदी, बेरोजगारी यासारख्या सर्व आघाड्यांवर अयशस्वी झाले. व्यापारी आणि उद्योग क्षेत्र देखील प्रभावित झाले. मागील निवडणुकीत त्यांना दिले गेलेले बहुतेक शब्द पूर्ण करण्यात ते अयशस्वी ठरले, असा आरोप त्यांनी केला. प्रचार मोहिमेदरम्यान नरेंद्र मोदी 'सबका साथ सबका विकास' विसरले असुन आमच्या भारतीय जवानांच्या नावावर मत मागत आहेत, ते चुकीचे आहे. या संदर्भात रिटायर्ड आर्मी ऑफिसरच्या तक्रारी राष्ट्रपतींकडे पोहोचल्या आहेत, असे ते म्हणालेत. 

भाजप सरकारची दडपशाही आणि ब्लॅकमॅलिंग

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मोठ्या प्रमाणात भाजपत सामिल होत आहेत. त्या नेत्यांविषयी बोलताना जे लोक भाजपमध्ये सामील होत आहेत, त्यांना सरकारकडून कारवाईची भीती आहे. ही नेते मंडळी सहकार क्षेत्राच्या पट्ट्यातील असून भाजप 'साम दाम दंड भेद' अवलंबत त्यांना अडकवत आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकार दडपशाही करत असून तुमची कुंडली आमच्याकडे आहे असे सांगत ब्लॅकमॅलिंग करत आहे. सरकारकडे काहीच पुरावे नाहीत मात्र तुम्ही कर्ज वगैरे घेतली असली तर मिटवावी, असा सल्ला मी देतो असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.