'भाजप सरकारनं माफीनामा लिहून घ्यायचं काम सुरू केलं'

काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी युती शासनाच्या कर्जमाफी योजनेचा खरपूस समाचार घेतला.

Updated: Aug 8, 2017, 06:57 PM IST
'भाजप सरकारनं माफीनामा लिहून घ्यायचं काम सुरू केलं' title=

शिर्डी : काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी युती शासनाच्या कर्जमाफी योजनेचा खरपूस समाचार घेतला. आघाडी सरकारनं ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मात्र त्यावेळी कुठलेही फॉर्म भरुन घेतले नव्हते. आता भाजप सरकारनं माफीनामाच लिहून घेण्याचं काम सुरू केल्याचं थोरातांनी म्हटलंय. संगमनेर तालुक्यातल्या वरुडी फाटा इथं बाळेश्वर मंदिर कमानीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.