ठाण्यात पावसाचा पहिला बळी, तरूणीचा मृत्यू

पावसाचा ठाण्यातील पहिला बळी

ठाणे : मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे प्रवास करणं कठीण होत होतं. अशात ठाण्यात पावसाचा पहिला बळी गेला आहे. मुसळधार पावसामुळे अपघात होऊन एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. घोडबंदर रोडवरील नागला बंदर चौक, भाईंदर पाडा भागातली ही घटना आहे. पावसामुळे टँकर न दिसून धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. कासारवडवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.