Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवा

Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिच सुरुच आहे. भाऊबीजेच्या दिवशी असं आहे वातावरण. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 3, 2024, 08:10 AM IST
Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवा

मुंबईत पुन्हा एकदा उष्णता वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरात पुन्हा एकदा लाहीलाही वाढली आहे. मुंबईतील तापमानाची नोंद 34 ते 35 डिग्री आहे.  राज्यातील काही ग्रामीण भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आधी पाऊस नंतर ढगाळ वातावरणामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. 12 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पावसाची रिपरिप देखील होत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कोकणात मात्र आठवडाभरापासून पाऊस नुसता धो-धो कोसळत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. या भागात सोसाट्याचा वारा सुटेल, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भाऊबीजेच्या दिवशी कसं असं वातावरण? आज राज्यात मिश्र वातावरण राहील मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात कोरडे आभाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाचा अंदाज ठरविण्यात आला आहे.

भाऊबीजेच्या दिवशी कसं असं वातावरण? 

आज राज्यात मिश्र वातावरण राहील मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात कोरडे आभाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाचा अंदाज ठरविण्यात आला आहे. 

थंडी वाढणार 

राज्यात हिवाळ्यात सुरुवात लवकरच होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सियस तर किमान तापमान 22 अंश सेल्सियस इतकं नोंदव्यात आला आहे. काही दिवसांमध्ये राज्यात तापमान घसरले आणि थंडीचे प्रमाण देखील वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे. लवकरच महाराष्ट्रात गुलाबी झालर अनुभवता येणार. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More