Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीप

Maharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...   

सायली पाटील | Updated: Sep 14, 2024, 07:16 AM IST
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीप
Maharashtra Weather news rain to step back for next 3 days light rainfall in konkan and vidarbha

Maharashtra Weather News : मुंबईसह कोकणात पावसाच्या जोरदार सरी आता काहीशा विश्रांती घेताना दिसत असून, अधूमधून होणारी पावसाची रिपरिप वगळता पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, तर आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज आहे. शहरात मागील काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यामुळं कमाल आणि किमान तापमानातही वाढ होताना दिसत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तिथं कोकणातही पावसानं एक पाऊल मागं घेतल्यामुळं आता पुन्हा एकदा सूर्यकिरणांचे कडवसे वातावरणाचं वेगळं रुप समोर आणत आहेत. विदर्भ मात्र या साऱ्या प्रणालीला अपवाद ठरत आहे. कारण, इथं काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : दया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?

 

का कमी झाला पाऊस?

मध्य भारतातील कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेकडे गेलं असून, त्यामागोमागच आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राती निर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं राज्यातून पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पश्चिम बंगाल आणि त्या क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळू शकते. याशिवाय गुजरातच्या दक्षिणेपासून कर्नाटकापर्यंतही हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं त्याचे कमीजास्त प्रमाणातील परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसू शकतात. 

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More