Weather Update : रेड अलर्ट! उत्तरेकडील शीतलहरींमुळं महाराष्ट्र गारठला; राज्याच्या 'या' भागात तापमान 4.4 अंश

Maharashtra Weather Update : राज्यात गारठा वाढला, कुठे नोंदवण्यात आलं नीचांकी तापमान? वीकेंडच्या तोंडावर पाहून घ्या हवामान वृत्त.   

सायली पाटील | Updated: Jan 25, 2024, 08:02 AM IST
Weather Update : रेड अलर्ट! उत्तरेकडील शीतलहरींमुळं महाराष्ट्र गारठला; राज्याच्या 'या' भागात तापमान 4.4 अंश
Maharashtra weather update temprature drop down in mumbai and suburban part

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलेला असल्यामुळं त्या दिशेनं राज्याकडे येणारे थंड वारे इथंही परिणाम दाखवताना दिसत आहे. उत्तरेत थंडीचा कडाका कायम राहणार असून, येत्या काही दिवसांमध्ये थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसाठी गुरुवाकरी थंडीचा रेड अलर्टही देण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये वाढलेल्या थंडीचे परिणाम महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशापर्यंत दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील किमान तापमानात सातत्यानं घट नोंदवण्यात आली असून, राज्यातील किमान तापमान 10 अंशांहून कमी असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी निफाड येथे राज्यातील सर्वात नीचांकी म्हणजेच 4.4 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर, धुळ्यामध्ये 4.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. 

उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक परिणाम 

तिथं विदर्भात अवकाळीचा इशारा दिलेला असतानाच इथं महाराष्ट्राच्या उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानाच मोठी घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नाही. धुळे, नाशिक, निफाड, जळगाव आणि पुण्यामध्ये तापमान 10 अंशांच्याही खाली येऊ शकतं. 

हेसुद्धा वाचा : Maratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चामध्ये मोठा बदल;  आंदोलकांमध्ये नाराजी 

मराठवाडा आणि विदर्भावर मात्र चक्रिय वाऱ्यांची स्थिती कायम असल्यामुळं ढगांचं सावट असेल. यामध्ये गारठाही तितकाच जाणवणार आहे. पुढील 48 तासांमध्ये या भागांमध्ये तापमानात मात्र काही अंशांची वाढ नोंदवली जाऊ शकते. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More