'उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण...,' राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, 'दिवे लावण्याचे उद्योग...'

Raj Thackeray on Ajit Pawar: पुण्यात मुसळधार पावसाने (Pune Rain) धुमाकूळ घातल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुराचा फटका बसलेल्या नागरिकांची भेट घेतली. यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रासह राज्य सरकारवरही टीका केली.   

शिवराज यादव | Updated: Jul 29, 2024, 02:36 PM IST
'उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण...,' राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, 'दिवे लावण्याचे उद्योग...' title=

Raj Thackeray on Ajit Pawar: पुण्यात मुसळधार पावसाने (Pune Rain) धुमाकूळ घातल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुराचा फटका बसलेल्या नागरिकांची भेट घेतली होती. यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रासह राज्य सरकारवरही टीका केली. गेल्या 10 वर्षात पुणे फार विस्कटलं आहे. सर्व राजकीय पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवले तर शहराचा प्रश्न सुटेल. हे एकट्या पक्षाचं काम नाही असं मत राज ठाकरेंनी मांडलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत टोलाही लगावला. 

"पाऊस पडणं आपल्या हातात नाही. पण असा पाऊस  पडल्यानतंर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिग केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्याचे आहेत. ते नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं. त्यांनी यात लक्ष घालायला नको का?  नदी जाणारं जगातील हे एकमेव शहर नाही. तिथे ज्या गोष्टी होतात त्या आपल्याकडे का होत नाही. इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा यावर बोललं पाहिजे," असी संतप्त टीका राज ठाकरेंनी केली आहे. 

टाऊन प्लानिंग नावाची काय गोष्टच दिसत नाही

"मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुण्याला वेळ लागणार नाही. हे सगळं त्याचंच चित्र आहे. सरकारकडून विकासाची योजना येते, पण टाऊन प्लानिंग नावाची काय गोष्टच दिसत नाही आहे. किती गाड्या य़ेतात, त्या पार्क कशा होणार? लोक जाणार कसे? टाऊन प्लानिंग करताना किमान हजार लोकांसाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या केल्या जात नाहीत. शाळा, हॉस्पिटल, बागा असाव्या लागतात. अशी कोणतीही गोष्ट आपल्या शहरांमध्ये राबवल्या जात नाही. दिसली जमीन की विक इतका एकच उद्योग सुरु आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत

सरकार राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीये

"आज पुण्यात पाच शहरं झाली आहेत. मुंबईत लोखंडवाला कॉम्लेक्स झालं तेव्हा वेगळी मुंबई झाली असं वाटलं. पण पुण्यात जितक्या कमी कालावधीत या घटना घडल्या हे अदभूत आणि विचित्र आहे. पुणे शहर कुठपर्यंत पसरत झालं आहे. गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीये. नगरसेवक नसल्याने जबाददारी घेणार कोण? प्रशासनाने बोलायचं कोणी? त्यामुळे ही जबाबदारी प्रशासनाची आहे," असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

याला काय सरकार चालवणं म्हणतात का?

"या राज्यात बाहेरु येणाऱ्यांना फुकट घर देता आणि इथले लोक भीक मागत आहेत. याला काय सरकार चालवणं म्हणतात का? बाहेरुन आलेली मुलं या राज्याची होतात आणि आमची मुलं कोट्यातून प्रवेश मागत आहेत. राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही? महाराष्ट्राचा कोणी विचार कऱणार आहे की नाही? मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बाहेरुन येणारे फुकट घऱ घेऊन जात आहेत आणि येथील स्वत:च्या कष्टाचे पैसे घालणारे लोक वाऱ्यावर आहेत, जे या राज्याचे मालक आहे," असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. 

राज्य सरकारच्या खात्याची आणि पालिकेची ही संबंधित जबाबदारी आहे. पनवेल आणि ठाण्यावरुन साफसफाईसाठी लोक आणावी लागतात हे लाजिरवाणं आहे. तुम्हाला बाहरेच्या महापालिकांकडे सफाईसाठी लोक मागावे लागतात अशी खंतही त्यांनी मांडली. निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत. मी काल ज्यांना भेटलो त्यांच्या अंगावर फक्त एक कपडा होता. रोगराई वाढली कर कोण पाहणार? राज्य सरकारला म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लक्ष घालावं लागणार आहे असंही ते म्हणाले. 

एखादा प्रकल्प आणताता सर्वांना विचारुन का आणत नाही? 

"एखाद्या शहरात अनेक संस्था काम करत असतात. या सगळ्या संस्था यांची एकत्रित बैठक होत नाही का? टेंडर निघाले की पैसे काढता येतात, यामुळे चांगले रस्ते, फुटपाथ मिळत नाहीत. या शहरातील नगरसेवकांनी नीट लक्ष दिलं पाहिजे. यांच्या बैठका होणार नसतील तर तर बर्बाद होणार," असं त्यांनी सांगितलं. एका महिलेला भेटलो, जिच्या पोटचा मुलगा गेला होता. जे तिला कळतं ते प्रशासनला कळत नाही का? त्या महिलेच्या पोटचा मुलगा गेला आहे. अन् त्यानंरही हिंमतीने बोलत होत्या याचं आश्चर्य वाटलं. एखादा प्रकल्प आणताता सर्वांना विचारुन का आणत नाही? मनात आला म्हणून लगेच प्रकल्प आणता. पत्रकार, नागरिकांशी काही बोलत का नाही? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.