भाऊ-बहिणीची गळा चिरुन हत्या, औरंगाबादमध्ये उडाली खळबळ

औरंगाबादमधील हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरलं

Updated: Jun 10, 2020, 03:04 PM IST
भाऊ-बहिणीची गळा चिरुन हत्या, औरंगाबादमध्ये उडाली खळबळ title=

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एका घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. सातारा परिसरातील कनकोरबेन नगर येथे भाऊ-बहिणीची गळा चिरुन हत्या करण्यात आली. हत्या करुन हे आरोपी घरातील दीड किलो सोन्याचे दागिने आणि रोख रुपये लुटून फरार झाले. ही घटना रात्री ८:३० च्या दरम्यान समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धक्कादायक म्हणजे या घटनेत आरोपींनी दोघा बहिण-भावाची निघृण हत्या केली.

१६ वर्षाचा सौरभ खंदाडे दहावीत तर १८ वर्षाची किरण खंदाडे बीए प्रथम वर्गात शिकत होती. हे कुटुंब २०१७ पासून या घरात भाड्याने राहत होतं. खंदाडे यांचा शेती व्यवसाय आहे. सकाळी या मुलांची आणि आणि मोठी बहिण कारने पाचनवडगावला गेले होते. त्यामुळे किरण आणि सौरभ हे दोघेच घरी होते. दुपारी १:२२ वाजता किरणने आईला फोन केला होता. त्यानंतर रात्री ८:३० च्या दरम्यान जेव्हा ते घरी आले तेव्हा मुलांना आवाज दिल्यानंतर ही मुलांनी गेट न उघडल्यामुळे ते सर्व आत गेले. घरचा दरवाज नुसता लोटलेला होता. पण जेव्हा ते बाथरुममध्ये पोहोचले तेव्हा किरण आणि सौरभ हे मृत अवस्थेत पडले होते. तसेच घरातील दीड किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग आणि रोख रक्कम ही चोरीला गेल्याचे समोर आले. 

या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.