फडणवीस सरकारला चार वर्षे, खडसेंनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली

माजी मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर टीकेची तोफ डागलीय.

Updated: Oct 31, 2018, 07:01 PM IST
फडणवीस सरकारला चार वर्षे, खडसेंनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली title=

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज ४ वर्ष पूर्ण होत आहेत. सरकारच्या हातात आता काही महिनेच शिल्लक आहेत, त्यातच राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाचा सामना सरकारला करायचा आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर टीकेची तोफ डागलीय. त्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.

फडणवीस सरकारच्या चौथ्या वर्षपूर्वीचं औचित्य साधून माजी मंत्री खडसे यांनी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर टीकेची तोफ डागलीय.  सरकारला ४ वर्ष पूर्ण होत असताना त्यावेळी शपथ घेतलेले आपण एकमेव मंत्री आज मंत्रिमंडळाच्या बाहेर असल्याची नाराजी खडसेंनी व्यक्त केली. 

भ्रष्टाचार केला असेल आणि चौकशी अहवालात स्पष्ट झालं असेल तर जनतेला सांगा, अन्यथा बाहेर का काढलं याच उत्तर देण्याचं आव्हान त्यांनी जाहीर सभेत केलं. चार वर्षे उलटली तरी उपसा सिंचन योजनेबाबत अभ्यास सुरू असल्याचं सांगत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता टीका केली.