कीटकनाशकाची फवारणीनंतर जेवणातून विषबाधा, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर विषबाधा झाल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू. 

Updated: Nov 16, 2019, 06:45 PM IST
कीटकनाशकाची फवारणीनंतर जेवणातून विषबाधा, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू title=

गडचिरोली : जिल्ह्यात कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर जेवण करताना विषबाधा झाल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर एका शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना अहेरी तालुक्यातील गुड्डीगुड्डम परिसरातील झीमेला गावाला घडली. 

गंगा आत्राम यांच्या शेतात रब्बी पिकावर फवारणी करण्यासाठी तिघेही शेतात गेले होते. फवारणी केल्यानंतर जवळच असलेल्या तलावातील मासे पकडून शेतातच स्वयंपाक केला. मात्र अर्ध्या तासातच तिघांचीही प्रकृती बिघडली. 

शेतात कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर स्वयंपाक करताना व्यवस्थित हात न धुतल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.