'एल्गार परिषदेमागे माओवाद्यांचं डोकं'

या प्रकरणात हाती लागलेली पत्रं हा निर्विवाद पुरावा आहे असं त्यांनी सांगितलं.

Updated: Aug 2, 2018, 09:37 PM IST

पुणे : अँटी फॅसिस्ट फ्रन्टच्या माध्यमातूनच पुण्यातील एल्गार परिषदेचं आयोजन करण्य़ात आलं होतं. एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसा पुरवला होता तसंच या परिषदेच्या आयोजनामागे त्यांचंच डोकं आहे असं पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी म्हंटलंय. मात्र कोरेगाव भिमामध्ये झालेला हिंसाचार माओवाद्यांनी घडवला असं आपण म्हणत नसल्याचंही रवींद्र कदम यांनी स्पष्ट केलं.

पत्र हा पुरावा 

या प्रकरणात हाती लागलेली पत्रं हा निर्विवाद पुरावा आहे असं त्यांनी सांगितलं. ती पत्रं आम्ही लिहीलेली नसून, त्यांच्या संगणकातून मिळाली असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं.