विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा मृत्यू

तीन मुलांना वाचवण्यात यश आले तर तीन मुलांचा पाण्यात बुडून  मृत्यू झालायं.

Updated: Sep 24, 2018, 09:46 AM IST
विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा मृत्यू  title=

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी गावात गणेश विसर्जनाच्या वेळी दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जनासाठी गेलेली 6 लहान मुले गावातील तळ्यात बुडाल्याचे समोर येतंय. यातील तीन मुलांना वाचवण्यात यश आले तर तीन मुलांचा पाण्यात बुडून  मृत्यू झालायं.

पाण्याचा अंदाज चुकला 

गावातील तळ्यात गणपती विसर्जन करताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने आणि तळ्यात असलेल्या चिखला मध्ये अडकून बसल्याने या 3 लहान चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.गणेश नारायण चक्कर (8 वर्षे), सुमित सावकार पाबळे (9 वर्षे ), वैभव विलास पाबळे (9 वर्षे ) अशी मृत मुलांची नावे असून या दुर्दैवी घटनेने कावळ पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे.