'मुलाच्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले'

माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवारांवर निशाणा साधला.

Updated: Jul 20, 2019, 02:50 PM IST
'मुलाच्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले' title=

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : मुलाच्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले असून 'मस्ती माझी नाही तर, मस्ती तुमची जिरली' असे म्हणत शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवारांवर निशाणा साधला. लोकसभेतील पराभवामुळे आढळराव पाटील यांची 'मस्ती जिरली' असल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. या टीकेला आढळराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

आढळराव पाटील यांनी शिरुर येथे पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर टिका केली. स्वत:च्या मुलाला निवडून आणता आले नाही म्हणून त्यांच्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.

यावेळी आढळराव पाटील बोलताना म्हणाले की, राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडुन माझ्यावर टिका केली. परंतु ज्यांच्या मुलाला मावळ लोकसभा मतदार संघातुन निवडुन आणता आलं नाही त्यांनी माझ्यावर टिका करणे हा विनोद आहे.हे लक्षात ठेवा "माझ्या शिवसेना पक्षाचे राज्यात 18 खासदार आहेत. तुमच्या पक्षाच्या फक्त चार खासदार आहे". माझा पराभव झाला मान्य आहे. परंतु जे निवडुन आले ते केवळ मालिकेमुळे निवडुन आले आहेत. पराभवानंतरही पक्षाने माझा योग्य सन्मान केला आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.

पार्थ जर पडला तर मी राजकारणातुन निवृत्त होइन असे  वक्तव्य अजित पवार यांनी निवडणुकिदरम्यान केले होते. या केवळ तोंडाच्या वाफा असुन घरचा पक्ष फोडणारा हा माणुस असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. मी लोकांशी नम्र वागणारा माणुस असुन आव्हानात्मक भाषा मी कधी केली नाही. अहंकाराने कधी वागलो नाही. माझ्या पक्षात माझा चांगला सन्मान असुन माझ्या पराभवाची चिंता तुम्ही करु नये असे म्हणत अजित पवारांना लक्ष केले आहे.