रश्मी ठाकरेंवर का होतेय कारवाईची मागणी

अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल  

Updated: Jan 26, 2022, 11:04 PM IST
रश्मी ठाकरेंवर का होतेय कारवाईची मागणी title=

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामना दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीवजा तक्रार अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आज शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात सपत्नीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राष्ट्रध्वजाला सलाम करत आहेत. पण, रश्मी ठाकरे या   स्तब्ध उभ्या असल्याचे दिसत आहेत. 

या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे असे अ‍ॅड. पाटील यांचे म्हणणे आहे. राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. मात्र, त्यावेळी रश्मी ठाकरे स्तब्ध उभ्या होत्या. त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.