यशवंत सिन्हा आणि नाना पटोले यांच्यात १ तास चर्चा

 भाजप खासदार नाना पटोले आणि भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची नागपूरमध्ये भेट झाली. यावेळी तब्बल १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 16, 2017, 02:35 PM IST
यशवंत सिन्हा आणि नाना पटोले यांच्यात १ तास चर्चा title=

नागपूर :  भाजप खासदार नाना पटोले आणि भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची नागपूरमध्ये भेट झाली. यावेळी तब्बल १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामूळे या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

मागील काही दिवसांपासून नाना पटोले यांनी शेतकरी प्रश्नावरुन, तर यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टिका केली होती.
त्यामुळे या दोन्ही टिकाकारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

दरम्यान अकोल्यात झालेल्या भाषणात यशवंत सिन्हा यांनी उपस्थित श्रोत्यांना 'मित्रो' म्हणणार नाहीय, असं म्हणत भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी मोदींना टोला लगावला. 
सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवरील निर्णयावर चांगलीच टीका केली. नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरलीय. नवीन रोजगार थांबलाय, कर्मचारी कमी केले जातायत. सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात. मात्र, आकडेबाजीच्या खेळानं देशाचं भलं होत नाही, असंही यशवंत सिन्हा म्हणाले.