पावसाने दिली मुंबईकरांना खुशखबर

बईसह उपनगरातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, पालघर येथेही जोरदार पाऊस झाला आहे.

Updated: Jun 25, 2017, 02:43 PM IST
पावसाने दिली मुंबईकरांना खुशखबर title=

मुंबई : ही बातमी खऱ्या अर्थाने मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, भातसा आणि वैतरणा या धरण क्षेत्रातही काल दुपारपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. 

या तीनही धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो.  या धरण क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. 

दरम्यान शहापूर तालुक्यातील नदडावमध्ये डोंगरीपाडा  येथे वीज कोसळून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

मुंबईसह उपनगरातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, पालघर येथेही जोरदार पाऊस झाला आहे.