मोठी बातमी । मुंबईत यावर्षी पाणीकपात होणार की नाही, ते जाणून घ्या

Mumbai Water Supply : मुंबईकरांची यंदा पाणीकपात टळणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत पुरेसा पाणीसाठा आहे.  

Updated: Mar 19, 2022, 08:02 PM IST
मोठी बातमी । मुंबईत यावर्षी पाणीकपात होणार की नाही, ते जाणून घ्या title=

मुंबई : Mumbai Water Supply : मुंबईकरांची यंदा पाणीकपात टळणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत पुरेसा पाणीसाठा आहे. ऑगस्टपर्यंत हा जलसाठा पुरेल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी आणि विहार अशा सात धरणांत पाणीसाठा होता. दररोज 3800 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो.

यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे तीन वर्षांतील सर्वाधिक 48 टक्के इतका पाणी या धरणात उपलब्ध आहे. यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीपासून मोठा दिलासा मिळाला आहे.