प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : अघोरी प्रकरणं आणि कृत्यांवर चाप बसवण्यासाठी म्हणून अनेक संघटना आणि शासन पातळीवरही प्रयत्न सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. (Kolhapur News)
कोल्हापुरातील कौलव गावातल्या एका घरामध्ये तीन फूट खड्डा खणला असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी राधानगरी पोलिसात जादूटोणा कायदा अंतर्गत 6 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.