मुंबय तुला बीएमसीवर भरोसा नाय काय, शिवसेनेला का झोंबलं?

मुंबय तुला बीएमसीवर भरोसा नाय काय, हे आरजे मलिष्काचं गाणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं. मलिष्काला तोंड बंद ठेवण्याचा इशारा देणाऱ्या शिवसेनेनं चक्क गाणंच तयार केले. 

Updated: Jul 19, 2017, 07:06 PM IST
मुंबय तुला बीएमसीवर भरोसा नाय काय, शिवसेनेला का झोंबलं? title=

मुंबई : मुंबय तुला बीएमसीवर भरोसा नाय काय, हे आरजे मलिष्काचं गाणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं. मलिष्काला तोंड बंद ठेवण्याचा इशारा देणाऱ्या शिवसेनेनं चक्क गाणंच तयार केले. 
 
रेड एफएमची आरजे मलिष्काचे हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. हे गाणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं. त्यामुळे एरवी भाजपला शिंगावर घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेला मलिष्काला प्रत्युत्तर देण्यासाठी गाणं लिहावं लागले. 

मात्र शिवसेनेनं गाणं लिहीलं असलं तरी मलिष्काच्या गाण्यावरून खुद्द शिवसेनेतच संभ्रमाचं वातावरण होतं. एकीकडे शिवसेना नगरसेवक किशोरी पेडणेकर मलिष्काला इशारा देत असतानाच महापौर मात्र हा व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असल्याचं म्हणत होते. 

शिवसेनेनं मलिष्काला प्रत्त्युत्तर दिलं असलं तरी मलिष्काचं गाणं सर्वसामान्यांना एवढं का भावलं याचाही विचार शिवसेनेनं करायला हवा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सर्वसामान्याच्या रोजच्या जगण्यातल्या कटकटीला फोडलेली वाचा या गाण्यातून मांडली होती. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून अगदी केंद्रापर्यंत प्रत्येक ठिकाणच्या अव्यवस्थेला वाचा फोडली होती. त्यामुळे मलिष्काच्या गाण्याला विरोध करून शिवसेनेनं आपल्या पायावर धोंडाच मारून घेतल्याचे बोलले जात आहे. 

वादात सापडलेले हे गाणं