नीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे मोदी-जेटलींवर फटकारे!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता नीरव मोदी प्रकरणावरुन भाजप सरकारवर व्यंगचित्रातून टीका केली आहे. 

Updated: Feb 18, 2018, 08:07 PM IST
नीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे मोदी-जेटलींवर फटकारे! title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता नीरव मोदी प्रकरणावरुन भाजप सरकारवर व्यंगचित्रातून टीका केली आहे. राज ठाकरेंनी त्यांचं अधिकृत फेसबूक पेजवरून हे व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रामध्ये 'बँक ऑफ विश्वास'मधून नीरव मोदी, विजय माल्ल्या बॅग भरून बाहेर जात असल्याचं दाखवण्यात आलंय. तर मोदी आणि अरुण जेटलींना वॉचमन दाखवण्यात आले आहेत. या व्यंगचित्रातले मोदी आणि अरुण जेटली बँकेच्या बाहेर बाकावर झोपलेले दिसत आहेत.

'आधीचे नालायक आहेत सांगितलं म्हणून आपण वॉचमन बदलले तर हेही झोपाच काढत आहेत आणि परिस्थिती पुन्हा तीच!' अशी ठेवीदाकांची परिस्थिती असल्याचं राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून दाखवलंय.