रामदास आठवलेंनी दिले मनसेला आव्हान

फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्याक आंदोलन करणाऱ्या मनसेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आव्हान दिले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 22, 2017, 05:48 PM IST
रामदास आठवलेंनी दिले मनसेला आव्हान  title=

मुंबई : फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्याक आंदोलन करणाऱ्या मनसेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आव्हान दिले आहे. 

एल्फिन्स्टन दुर्घेटनेनंतर घेतलेल्या आक्रोश मोर्चात राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांना रेल्वे परिसरातील जागा खाली करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्या मुदतीत स्टॉल न हटल्याने सोळाव्या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने फेरीवाल्यांना दणका दिला. त्यानंतर माध्यमातून विविध प्रतिक्रीया येऊ लागल्या. दरम्यान रामदास आठवले यांनीही मनसेला आव्हान दिले आहे.

फेरीवाल्यांना का मारता ?, मारायचं असेल तर सीमेवर जा आणि पाकिस्तानी सैनिकांना मारा असं आव्हानं आठवलेंनी दिले आहे. मनसेची दादागिरी सुरुच राहिली तर भीमसैनिक 'ईट का जवाब पत्थर से देंगे' असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मिरारोड इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मनसेवर निशाणा साधला.